शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

नाशिक महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 21:51 IST

पारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान

नाशिक : शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.सकाळपासून शहरातील गावठाण भागासह उपनगरांमध्येही मतदानाचा ओघ कमीच राहिला; मात्र दुपारी दीड ते साडे तीन च्या कालावधीत सरासरी १३ टक्क्यांनी वाढ होऊन मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला. दरम्यान, सोशल मिडियावरुन भावनिक लघुसंदेशाची ‘पोस्ट’ व्हायरल झाली. या पोस्टमधून नाशिककरांना मोठ्या संख्येने बाहेर पडून नाशिकच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर पोस्ट चांगलीच प्रभावी ठरली. दुपारी चारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली आणि नागरिकांवर सोशल पोस्टचा सकारात्मक प्रभाव पडल्याने लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर सर्वच केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते; मात्र जुने नाशिकसह उपनगरीय भागांमध्ये देखील बहुसंख्य केंद्रांच्या आतमध्ये लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. यामुळे केंद्रामधील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला आणि संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.