शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

उत्पादकांकडून ६० लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: July 6, 2014 00:42 IST

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत फॉर्म डी१ मध्ये ३१ मे २०१३ पर्यंत माहितीयुक्त वार्षिक परतावा न भरलेल्या नागपूर विभागातील परवानाधारक उत्पादकांकडून अन्न प्रशासन विभागाने ६० लाख रुपयांचा दंड

अन्न प्रशासन विभागाची मोहीम : नागपूर विभागात ९७२ परवानाधारकमोरेश्वर मानापुरे - नागपूर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत फॉर्म डी१ मध्ये ३१ मे २०१३ पर्यंत माहितीयुक्त वार्षिक परतावा न भरलेल्या नागपूर विभागातील परवानाधारक उत्पादकांकडून अन्न प्रशासन विभागाने ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला असून फॉर्म डी२ मध्ये ५० हजारांचा दंड आकारल्याची माहिती आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९७२ उत्पादक परवानाधारक आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यात ६०६ असून ३६७ उत्पादकांनी २०१२-१३ करिता वार्षिक विवरण भरले. शिवाय विवरण न भरलेल्या २७१ उत्पादकांकडून ३९ लाख २६ लाख रुपयांचा दंड वसूल केला. भंडारा जिल्ह्यात ७९ उत्पादकांपैकी २०१२-१३ करिता १७ जणांनी वार्षिक विवरण भरले तर ४ जणांकडून ६४ हजारांचा दंड वसूल केला. चंद्रपूर जिल्ह्यात १४१ पैकी ८९ उत्पादकांनी विवरण भरले तर ८९ उत्पादकांवर १३ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारला. वर्धा जिल्ह्यात ७५ पैकी ४७ जणांनी विवरण भरले तर विवरण न भरलेल्या २५ जणांकडून ५३ हजारांचा दंड वसूल केला. गडचिरोली जिल्ह्यात ७१ उत्पादक आहेत. त्यापैकी ४८ जणांनी २०१२-१३ करिता वार्षिक विवरण भरले. विवरण न भरलेल्या ४७ उत्पादकांकडून ५ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागाच्या कडक कारवाईमुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच २०१३-१४ या आर्थिक वर्षाकरिता विवरण भरणारे परवानाधारक उत्पादक वाढले आहेत. ३१ मे २०१४ पर्यंतच्या नागपूर जिल्ह्यात २६१ उत्पादकांनी वार्षिक विवरण भरले. भंडारा जिल्ह्यातून ३, चंद्रपूर १०६, वर्धा ३२ आणि गडचिरोली जिल्ह्यातून ५१ उत्पादकांनी विवरण भरले आहे. डी२ मध्ये ५० हजाराचा दंडअन्न सुरक्षा व मानके कायद्यांर्गत दुग्ध उत्पादक परवानाधारकांना डी२ मध्ये वार्षिक विवरण भरावे लागते. नागपूर विभागात १७२ उत्पादक आहेत. ४४ उत्पादकांवर ५० हजारांचा दंड विभागाने आकारला. ९८ उत्पादकांनी वार्षिक विवरण भरले नाही. नागपूर जिल्ह्यात १३२ उत्पादक आहेत. त्यापैकी ४५ जणांनी विवरण भरले. भंडार जिल्ह्यात २५, चंद्रपूर ५, वर्धा ९ आणि गडचिरोली जिल्ह्यात दुग्धजन्स पदार्थाचे केवळ १ उत्पादक आहे. नवीन कायद्यांतर्गत उत्पादकांना फॉर्म डी१ आणि डी२ मध्ये वार्षिक विवरण भरणे आवश्यक आहे. या कायद्याची उत्पादकांना माहिती आहे. कायद्याची माहिती नसल्याचे कारण पुढे करून २०१२-१३ करिता विवरण न भरलेले अनेक उत्पादक आहेत. दंडाची आकारणी बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे, असे मत अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.