शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावर ६ विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:50 IST

आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे.

मुंबई : आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे संभाव्य गर्दी पाहता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावर ६ विशेष एक्स्प्रेस फे-या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष एक्स्प्रेसची आरक्षण प्रक्रिया सोमवारपासून खुली होणार आहे. या विशेष एक्स्प्रेस १८ बोगींच्या असतील. यात एसी २ टिअरच्या ६ बोगी, एसी-३ टिअरच्या ८ बोगी, २ सामान्य बोगींचा समावेश असेल.नववर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होते. यामुळे या एक्स्प्रेसला वातानुकूलित प्रकारच्या एकूण१४ बोगी जोडण्यात आलेल्याआहेत. यामुळे हीच संधी ‘इनकॅश’ करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केल्याचा दिसून येत आहे. विशेष एक्स्प्रेसमधील सामान्य दर्जाच्या २ बोगी या विनारक्षित म्हणून चालविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर येथून १८ डिसेंबरपासून विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण विशेष शुल्कासह करता येणार आहे.दरवर्षी मुंबई-कोकण मार्गावर सेलिब्रेशनसाठी प्रवास करणाºयांची संख्या वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या मेल-एक्स्प्रेसची आसन क्षमता पाहून प्रवाशांच्या सोईसाठी विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.मुंबई-नागपूर सुपरफास्ट विशेष (एकल)०१०११ विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस २२ आणि २९ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० मिनिटांनी निघणार आहे, तर त्याच दिवशी दुपारी २.२० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल.नागपूर-करमाळी (गोवा) विशेष (एकल)०११९६ विशेष एक्स्प्रेस २२ आणि २९ डिसेंबरला नागपूर येथून सायंकाळी ७.५० मिनिटांनी निघणार आहे. ही एक्सप्रेस दुसºया दिवशी रात्री ९.३० मिनिटांनी करमाळी येथे पोहोचणार आहे.करमाळी (गोवा)- मुंबई विशेष (एकल)०११२२ विशेष एक्स्प्रेस २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी करमाळी येथून रात्री १०.३० मिनिटांनी निघणार आहे. ही एक्स्प्रेस दुसºया दिवशी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे