शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत चाळीवर झाड कोसळून ६ जण जखमी

By admin | Updated: August 6, 2016 03:10 IST

सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले.

डोंबिवली : सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले. त्यात सहा जण जखमी झाले. त्यातील गुडिया मेहता या महिलेला छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे.कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यात नांदिवली येथील कृष्णा पाटील यांच्या चाळीवर दुपारी ४ वाजता १०० वर्षांचे जुने वडाचे झाड कोसळले. त्यात रहिवासी गुडिया मेहता, शरद वर्मा, रीना मेहता, अंजली मेहता, रखमा पाटील व विनिता म्हात्रे हे जखमी झाले. ही घटना समजताच स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे व प्रकाश म्हात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दल व मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मात्र, केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र विभागाच्या आपत्कालीन कक्षाशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेथून कोणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.गुडिया, शरद व रीना यांच्यावर रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. अंजली, रखमा व विनिता यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या झाडामुळे चाळीतील चार खोल्यांचे नुकसान झाले. तसेच ‘महावितरण’चे सहा खांबही पडल्याने वीजपुरवठा बंद झाला. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुसळधार पावसामुळे शेजारील झाड अचानक कोसळले. त्यामुळे काही वेळ पुलावर वाहतूककोंडी झाली. >मुंब्रा येथे दोन घरांच्या भिंती कोसळल्यामुंब्रा : रेल्वे स्थानकाजवळील शाहूनगर वसाहतीतमधील दोन घरांच्या मागच्या बाजूच्या भिंती नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे शुक्रवारी कोसळल्या. यामुळे या परिसरात खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तेथील १३ घरांतील कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था बाजारपेठेतील पालिका शाळा क्र मांक ७५ मध्ये केली आहे. >मुसळधार पावसामुळे रेल्वे विस्कळीतठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. रेल्वेमार्गात पाणी तुंबल्यामुळे काही काळ लोकलसेवा बंद करावी लागली होती. मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या परिसरातील सुमारे २० गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. आतापर्यंत सर्वाधिक ठाणे शहर परिसरात २३१५ मिमी पाऊस झाला असून कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांत पाऊस झाला आहे.