शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणे जिल्ह्यात एसटी चालक - वाहकांचा संप सुरूच ५८७ बसफेऱ्या रद्द; ६० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:12 IST

जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या  रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

ठळक मुद्देआठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्याकेवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यानी अचानक पुकारलेला संप शनिवारच्या दुसऱ्या  दिवशी सुरूच आहे.जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या  रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या  ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज विभाग ठाणे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी व्यक्त केला.       ठाणे जिल्ह्यातील सामान्य जनतेसह विद्यार्थी, वयोवृध्दांसह रूग्णांचे प्रचंड हाल झाले. या संपाची मोठी झळ जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागाला बसली आहे. जिल्ह्यातील आठ बस आगारातील ५० टक्के बसेस आजच्या दुसऱ्या  दिवशी देखील बंद होत्या. पहिल्या दिवशी सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रीय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेऱ्या  रद्द केल्या होत्या. या दरम्यान आठ वाहक, चालक व अन्यकर्मचाऱ्याना निलंबित केले मात्र आज तशी कोठेही कारवाई झाली नाही. याशिवाय दरम्यान कोठेही खाजगी बसेस, कंपन्या व शाळांच्या बसेसव्दारे प्रवाशी वाहतूक सुरू नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सकाळी ७० टक्के व सायंकाळी ६० टक्के बसेस सुरू असल्याचा दावाही त्यांनी लोकमतकडे केला.      जिल्ह्याभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ व ठाणे २ या आगारातील प्रत्येकी ११८ बसफेऱ्या  रद्द केल्या आहेत. याशिवाय भिवंडी आगारात सर्वाधिक १६४ बस फेऱ्या  रद्द केल्यामुळे केवळ ५२ फेऱ्या  दुपारनंतर पूर्ण झाल्या. या खालोखाल शहापूरला ६३ फेऱ्या , कल्याणला केवळ २२ फेरी, विठ्ठलवाडीला ८०, मुरबाडला ११ फेऱ्या  आणि वाडा येथे देखील आज ११ बसफेऱ्या  रद्द कराव्या लागल्या आहेत. कालच्या तुलनेत कल्याण मुरबाड व वाडा येथे आज बसफेऱ्या  रद्द करव्या लागल्याचे निदर्शनात आले.

टॅग्स :thaneठाणे