शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 07:30 IST

पाच महिन्यांतील आकडेवारी; कोरोना काळात घरगुती वीज ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा फटका महावितरणच्या बिल वसुलीवरही बसला. एप्रिल ते आॅगस्ट, २०२० या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर झेपावली. त्यात सर्वाधिक ३ हजार ५२१ कोटींची थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हेसुद्धा यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एप्रिल ते आॅगस्ट, २०१९ या कालावधीत घरगुती वीज ग्राहकांना ८ हजार ९४९ कोटींची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी ८,१०७ कोटींचा भरणा ग्राहकांनी केला. यंदा याच कालावधीत महावितरणने ९ हजार १० कोटींची बिले पाठवली असून ग्राहकांनी जेमतेम ५,४८९ कोटीच जमा केल्याची माहिती हाती आली आहे.

मार्च ते मे या महिन्यांतील सरासरी बिलांमुळे घरगुती वीज ग्राहकांना जून आणि जुलैमध्ये भरमसाट बिले आली होती. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर सरकारने या वीज बिलांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, सवलत दिल्यास राज्याच्या तिजोरीवर भार वाढेल, अशी सबब देत वित्त विभागाने प्रस्तावित बिल माफीला अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही.

वीज बिले माफ होतील या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा नाही. यापुढेही काहीतर होईल आणि बिले माफ होतील, या आशेवर अनेक ग्राहक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात औद्योगिक कारखाने बंद होते. अनलॉक प्रक्रियेदरम्यान निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर वीज मागणीत वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना १० हजार ३७२ कोटींची बिले दिली असून त्यापैकी ८८८२ कोटींचा भरणाही झाला आहे. महावितरणने पाच महिन्यांत एकूण २२ हजार ५९ कोटींची बिले पाठवली असून त्यापैकी १६ हजार ३२६ कोटींची वसुली झाली आहे. सर्वाधिक औद्योगिक ग्राहकांकडे १४९० आणि व्यावसायिक ग्राहकांकडे ७३१ कोटींची थकबाकी आहे.

व्यावसायिक आस्थापनांचे आस्ते कदमअनलॉकच्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांना परवानगी दिली जात असली तरी त्यांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे तेथील विजेची मागणी ३४ टक्क्यांनी कमीच आहे. गेल्या पाच महिन्यांत या आस्थापनांना २ हजार ६७७ कोटींची बिले देण्यात आली असून त्यापैकी १९४६ कोटींची बिले या व्यावसायिकांनी भरली आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण