शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

वर्षासहलीसाठी गेलेल्या मुंबईतील ५५ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

By admin | Updated: June 27, 2017 03:19 IST

माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे.

गिरीश गोरेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे विद्यार्थी तेथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्यावर गेले होते. जवळपास दोन तास हे बचावकार्य सुरू होते. मुंबईतील पोदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच. आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्यावर रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले. या ठिकाणी देवकुंड व इतर धबधबे एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार झाला असून, येथूनच कुंडलिका नदी उगम पावते. त्या दोन्ही प्रवाहांत सदर ५५ विद्यार्थी सहलीची मौजमजा घेण्यासाठी आले होते. मात्र, दुपारनंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी धावपळ झाली. याच धावपळीत तानेश चेतन बोरकर (१७ रा. मुंबई), हा विद्यार्थी दोन्ही प्रवाहाच्या पलीकडे वाहत गेल्याने जखमी झाला आणि दुसऱ्या बाजूस अडकला होता.इतर विद्यार्थ्यांना नदी ओलांडून येणे शक्य नव्हते व पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे मनजित ठाकूर याने मोबाइलद्वारे रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तेथील परिस्थिती कळवली. त्यानंतर माणगाव पोलीस ठाणे अंमलदार म्हात्रे यांनी रावळजे दूरक्षेत्र येथे पेट्रोलिंग करत असलेले माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, कर्मचारी अनिल वडते, रमेश बोडके तसेच टेकाडे यांनी विरेंद्र सावंत यांचे, दैव राफ्टिंगचे पथक घेऊन धबधब्याच्या ठिकाणी धाव घेतली. पोलीस आणि राफ्टिंगच्या पथकाच्या मदतीने दोन ते अडीच तास निकराचे प्रयत करून, सर्व विद्यार्थ्यांची सायंकाळी उशिरापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली.