शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

जिल्ह्यात दरमहा ५००० लिटर गोमूत्र अर्क निर्मिती

By admin | Updated: April 4, 2015 00:09 IST

अभिनव उपक्रम : भाकड गार्इंपासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ

नरेंद्र रानडे - सांगली -भाकड गाई कत्तलखान्याकडे जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील पंधरा गोप्रेमी स्वतंत्ररित्या मागील दीड वर्षापासून एक उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे याला धार्मिकतेचे वलय नसून वैज्ञानिकतेचा आधार आहे. गोमूत्राचे औषधी गुण लक्षात घेऊन शेतकऱ्यांकडून गोमूत्र खरेदी करून त्यापासून गोमूत्र अर्क तयार करण्यात येत आहे. आज महिन्याला जिल्ह्यात पंंधरा हजार लिटर गोमूत्र संकलित होत असून त्यापासून पाच हजार लिटर गोमूत्र अर्काची निर्मिती होत आहे. त्याचप्रमाणे गाईच्या अन्य घटकांपासूनही होणारे विविध लाभ शेतकऱ्यांना पटवून देऊन त्यांनाही नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतीचा आधार काही प्रमाणात गोवंश हाच आहे. शेतकरी देशी गाय पाळण्यास प्राधान्य देतो. परंतु भाकड गाई सांभाळणे हे कित्येकांना शक्य होत नाही. परिणामी त्या गाई कत्तलखान्याकडे रवाना करण्यात येतात. तथापि गाईचा अखेरपर्यंत उपयोग होतो, हे संशोधनातून सिध्द झाले आहे. केंद्र शासनाच्या मान्यतेने ‘पंचगव्य थेरपी’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून गाईचे महत्त्व कसे आहे त्याचा अभ्यास करण्यात येतो. तामिळनाडू, गडचिरोली येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधितांना दोन वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करावे लागते. यानंतर त्यांना ‘गव्यसिध्द’ ही पदवी प्राप्त होते. जिल्ह्यातील सव्वाशे जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यातील पंधरा ते वीस जणांनी गोमूत्र अर्क निर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे. तेथे महिन्याला सुमारे पंधरा हजार लिटर गोमूत्र संकलित करण्यात येते व त्यावर प्रक्रिया करून गोमूत्र अर्क तयार केला जातो. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून वीस रुपये लिटर या दराने गोमूत्र खरेदी करण्यात येते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमात शिकविल्याप्रमाणे विविध उपपदार्थही तयार केले जातात. प्रयोगशाळेत चाचणी करुन गाईपासून निर्मिती होणाऱ्या पदार्थांमध्ये कोणते घटक किती प्रमाणात मिसळावेत, याचे प्रमाण निश्चित केलेले आहे. शेणापासून निर्मित दंतमंजनालाही मागणी वाढत आहे. आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हितासाठीच राबलेल्या गाई भाकड झाल्या म्हणून कत्तलखान्यात विकू नयेत, तर त्यांचे गोमूत्र, शेण आदींपासून आर्थिक लाभ करून घ्यावा, असे आवाहनही कृतिशील गोप्रेमींनी केले आहे. शेतकऱ्यांनी धार्मिकतेच्या बंधनात अडकून उपयोग नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गाईकडे एक उपयुक्त पशू म्हणून पाहिले आहे. आपणदेखील वैज्ञानिकतेचा आधार घेत गाईपासून आर्थिक लाभ कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. - अंकुश गोडसे,  अध्यक्ष, गोविज्ञान व गोसंवर्धन संस्था सांगली.गोमूत्र, शेण याचे उपयोग शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजेत. आज समाजातून गोमूत्र अर्काला वाढती मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोमूत्र अर्क निर्मितीला प्राधान्य देण्याबरोबरच गाईच्या पंचगव्यापासून निर्मित उपपदार्थ निर्मितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.- गव्यसिध्द डॉ. नीतेश ओझा, सांगली.गोमूत्र अर्क निर्मिती व उपयोगगाईने सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी दिलेले गोमूत्र शेतकऱ्यांकडून गोळा केले जाते. ते उच्च तापमानाला उकळले जाते. त्यानंतर त्यापासून निर्मित बाष्पावर प्रक्रिया करुन पुन्हा गोमूत्रात रूपांतर केले जाते. यालाच गोमूत्र अर्क म्हणतात. हे कित्येक वर्षे टिकते. साधारणत: पंधरा हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केल्यावर पाच हजार लिटर गोमूत्र अर्क तयार होतो. जिल्ह्यात गोमूत्र अर्कास दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. नियमितपणे गोमूत्र अर्क घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते असे ‘गव्यसिध्द’ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. प्रामुख्याने लठ्ठपणा कमी करणे, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, कर्करोग आदी रोगांपासून बरे होण्यासाठी गोमूत्र सेवन करण्याकडे काही नागरिकांचा कल आहे.