शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

By admin | Updated: October 10, 2016 05:58 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहतुकीबरोबरच एसटीच्या सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला. आंदोलनामुळे मालवाहतुकीचे तब्बल ५0 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली. या घटनेत एसटी बसगाड्यांचीही जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने महामंडळाला ३ कोटींपेक्षा जास्त फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिक आणि परिसरात आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करतानाच जाळपोळही केली. यात मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. महामार्गाजवळच असणाऱ्या गोंदेगाव, वडवली गाव आणि आणखी एका ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. एक सुमो गाडी तर एक दुचाकी वाहन आंदोलनकर्त्यांकडून जाळून रास्ता रोको करण्यात आला. दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्पच होती. मुंबईहून कसारामार्गे नाशिकला जाणारी वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की,मुंबईच्या विविध भागांतून सुमारे ४५ हजारांहून अधिक माल वाहतुक गाड्या या मार्गाने उत्तर आणि पूर्व भारतात जातात. मुंबई-आग्रा द्रूतगती मार्गावरील घोटीनजीक झालेल्या रास्ता रोकोचा सर्वाधिक फटका बसला. बऱ्याच वाहनांच्या काचा फोडून टायर फाडण्यात आले आहेत. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रारही वाहन मालकांनी केली असल्याचे सांगितले. तीव्र आंदोलनामुळे माल वाहतुकीचे एका दिवसात सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. शिवाय आणखी १२ ते २४ तास आंदोलनाचा फटका बसल्यास नुकसानाची आकडेवारी वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाड्यांचे नुकसान मिळून वाहतुकदारांना ५० कोटींहून अधिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे ते म्हणाले. दरम्यान या आंदोलनात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी सात एसटी बस जाळल्या तर नऊ बसची तोडफोड केली. यामुळे महामंडळाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. या मार्गावरुन एसटीच्या ५00 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यावर परिणाम झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जर परिस्थीती अशीच राहिल्यास सोमवारीही मालवाहतुक आणि एसटी सेवांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)