शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मालवाहतूकदारांचे ५० कोटींचे नुकसान

By admin | Updated: October 10, 2016 05:58 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले

मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर रविवारी नाशिकमध्ये दिवसभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहतुकीबरोबरच एसटीच्या सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला. आंदोलनामुळे मालवाहतुकीचे तब्बल ५0 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देण्यात आली. या घटनेत एसटी बसगाड्यांचीही जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने महामंडळाला ३ कोटींपेक्षा जास्त फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिक आणि परिसरात आंदोलनकर्त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड करतानाच जाळपोळही केली. यात मुंबई ते आग्रा, नाशिक महामार्गावरील वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला. महामार्गाजवळच असणाऱ्या गोंदेगाव, वडवली गाव आणि आणखी एका ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. एक सुमो गाडी तर एक दुचाकी वाहन आंदोलनकर्त्यांकडून जाळून रास्ता रोको करण्यात आला. दुपारी २ ते सायंकाळी ७दरम्यान महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्पच होती. मुंबईहून कसारामार्गे नाशिकला जाणारी वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य आणि माजी अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की,मुंबईच्या विविध भागांतून सुमारे ४५ हजारांहून अधिक माल वाहतुक गाड्या या मार्गाने उत्तर आणि पूर्व भारतात जातात. मुंबई-आग्रा द्रूतगती मार्गावरील घोटीनजीक झालेल्या रास्ता रोकोचा सर्वाधिक फटका बसला. बऱ्याच वाहनांच्या काचा फोडून टायर फाडण्यात आले आहेत. आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रारही वाहन मालकांनी केली असल्याचे सांगितले. तीव्र आंदोलनामुळे माल वाहतुकीचे एका दिवसात सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. शिवाय आणखी १२ ते २४ तास आंदोलनाचा फटका बसल्यास नुकसानाची आकडेवारी वाढेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गाड्यांचे नुकसान मिळून वाहतुकदारांना ५० कोटींहून अधिक भुर्दंड सहन करावा लागल्याचे ते म्हणाले. दरम्यान या आंदोलनात एसटीला मोठा आर्थिक फटका बसला. आंदोलनकर्त्यांनी सात एसटी बस जाळल्या तर नऊ बसची तोडफोड केली. यामुळे महामंडळाला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. या मार्गावरुन एसटीच्या ५00 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यावर परिणाम झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जर परिस्थीती अशीच राहिल्यास सोमवारीही मालवाहतुक आणि एसटी सेवांवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)