शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

हाणामारी करणा-यांना ५ वर्षे समाजकार्याची शिक्षा; लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:46 IST

किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत.

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत. तशी कामे केल्याचे सरपंचांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दर महिन्याला तलाठ्याकडे सादर करावे. तसेच उभय पक्षातील सात जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये शास्ती (कॉस्ट) म्हणून खंडपीठातील विधिसेवा उपसमितीकडे जमा करावेत, असे आदेश न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने दिले.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परस्पर विरोधी पॅनल उभे करण्याच्या कारणावरून श्रीहरी गीते आणि कल्याण गीते यांच्या गटाने (भाऊबंदांनी) परस्परांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दोन्ही पक्षांविरुद्ध गंभीर दुखापत करणे, मारहाण, मुंबई पोलीस कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते, तर कल्याण गीते गटाविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता.लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूरगावात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याचप्रमाणे उभयपक्षातील वैमनस्य कायमचे संपुष्टात यावे यासाठी गावातील प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन उभयपक्षामध्ये तडजोड घडवून आणली व त्यांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवले. त्यावरून उभयपक्षांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी खंडपीठात अर्ज केले होते. पाच वर्षांपर्यंत समाजकार्य करण्याचे लेखी हमीपत्र देण्याच्या अटीवर खंडपीठाने उभयपक्षांचे अर्ज मंजूर केले.

टॅग्स :Courtन्यायालय