शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

हाणामारी करणा-यांना ५ वर्षे समाजकार्याची शिक्षा; लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:46 IST

किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत.

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत. तशी कामे केल्याचे सरपंचांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दर महिन्याला तलाठ्याकडे सादर करावे. तसेच उभय पक्षातील सात जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये शास्ती (कॉस्ट) म्हणून खंडपीठातील विधिसेवा उपसमितीकडे जमा करावेत, असे आदेश न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने दिले.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परस्पर विरोधी पॅनल उभे करण्याच्या कारणावरून श्रीहरी गीते आणि कल्याण गीते यांच्या गटाने (भाऊबंदांनी) परस्परांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दोन्ही पक्षांविरुद्ध गंभीर दुखापत करणे, मारहाण, मुंबई पोलीस कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते, तर कल्याण गीते गटाविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता.लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूरगावात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याचप्रमाणे उभयपक्षातील वैमनस्य कायमचे संपुष्टात यावे यासाठी गावातील प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन उभयपक्षामध्ये तडजोड घडवून आणली व त्यांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवले. त्यावरून उभयपक्षांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी खंडपीठात अर्ज केले होते. पाच वर्षांपर्यंत समाजकार्य करण्याचे लेखी हमीपत्र देण्याच्या अटीवर खंडपीठाने उभयपक्षांचे अर्ज मंजूर केले.

टॅग्स :Courtन्यायालय