शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा

By admin | Updated: March 1, 2017 03:50 IST

प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल

ठाणे : महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प लेखाजोखा स्वरूपात न राहता त्यात विविध प्रस्तावांची मांडणी करताना त्या प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल, अशी नवी मांडणी माहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जयस्वाल हे शहराचा पुढील ५ वर्षांचा व्हिजन आराखडा सादर करून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहेत.महापालिकेचा हा आराखडा प्रत्येक प्रभागनिहाय असेल. प्रत्येक विभागाने अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित प्रकल्पांची मांडणी करताना त्या प्रस्तावाचा कालावधी ५ वर्षांपेक्षा कमी असू नये तसेच त्या ५ वर्षांमध्ये संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने काय पावले उचलण्यात येणार आहेत, त्याचे आर्थिक नियोजन कसे असणार आहे याची संपूर्ण मांडणी प्रस्तावातच करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. या व्हिजन प्लॅनची आखणी जशी मुख्यालयस्तरावर होणार आहे तशीच ती प्रभागस्तरावर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित प्रभागांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांना एकत्रितपणे हा आराखडा तयार करावा असे त्यांनी सूचित केले आहे.या आराखड्यात रस्ते, भांडवली कामे आदींचाच समावेश न करता खासगी लोकसहभागातून काय कामे करता येतील, ५ वर्षांत उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्यासाठी काय धोरण आखण्याची गरज आहे आदी सर्व बाबींचा तपशील व आवश्यक आर्थिक तरतुदींची गरज याचा गोषवारा नमूद करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी) >अहवाल सादर करण्याचे विभागांना आदेश या संदर्भात आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर ते स्वत: विभागनिहाय सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची उपयुक्तता तपासून अंतिम निर्णय घेणार आहेत. प्रत्येक विभागाने सादर केलेल्या आराखड्यानंतर त्यातील व्यवहार्य आणि योग्य कल्पना उचलून त्या आधारे शहराचा अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करून त्याची रचना केली जाणार असल्याने त्याचा ठाण्याच्या विकासाला फायदा होईल.