शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा ५ वर्षांचा व्हिजन आराखडा

By admin | Updated: March 1, 2017 03:50 IST

प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल

ठाणे : महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प लेखाजोखा स्वरूपात न राहता त्यात विविध प्रस्तावांची मांडणी करताना त्या प्रस्तावांचे व्हिजन हे ५ वर्षांपेक्षा कमी नसावे, जेणेकरून त्या प्रकल्पांची या शहरासाठी असेलेली उपयुक्तता सिद्ध होईल, अशी नवी मांडणी माहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जयस्वाल हे शहराचा पुढील ५ वर्षांचा व्हिजन आराखडा सादर करून शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहेत.महापालिकेचा हा आराखडा प्रत्येक प्रभागनिहाय असेल. प्रत्येक विभागाने अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित प्रकल्पांची मांडणी करताना त्या प्रस्तावाचा कालावधी ५ वर्षांपेक्षा कमी असू नये तसेच त्या ५ वर्षांमध्ये संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने काय पावले उचलण्यात येणार आहेत, त्याचे आर्थिक नियोजन कसे असणार आहे याची संपूर्ण मांडणी प्रस्तावातच करण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. या व्हिजन प्लॅनची आखणी जशी मुख्यालयस्तरावर होणार आहे तशीच ती प्रभागस्तरावर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित प्रभागांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांना एकत्रितपणे हा आराखडा तयार करावा असे त्यांनी सूचित केले आहे.या आराखड्यात रस्ते, भांडवली कामे आदींचाच समावेश न करता खासगी लोकसहभागातून काय कामे करता येतील, ५ वर्षांत उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्यासाठी काय धोरण आखण्याची गरज आहे आदी सर्व बाबींचा तपशील व आवश्यक आर्थिक तरतुदींची गरज याचा गोषवारा नमूद करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी) >अहवाल सादर करण्याचे विभागांना आदेश या संदर्भात आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर ते स्वत: विभागनिहाय सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांनी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची उपयुक्तता तपासून अंतिम निर्णय घेणार आहेत. प्रत्येक विभागाने सादर केलेल्या आराखड्यानंतर त्यातील व्यवहार्य आणि योग्य कल्पना उचलून त्या आधारे शहराचा अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांचा विचार करून त्याची रचना केली जाणार असल्याने त्याचा ठाण्याच्या विकासाला फायदा होईल.