शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

ट्रॅव्हल्समध्ये होरपळून ५ ठार, १५ जखमी

By admin | Updated: May 30, 2014 01:16 IST

धावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. आणि क्षणार्धात संपूर्ण बसला आगीने वेढले. यात ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले गेले. अंगावर शहारे आणणारी ही घटना गुरूवारी

अमरावती-नागपूर महामार्गावरील भीषण घटना : दोघांचीच ओळख पटलीअनिल रिठे - तळेगाव (श्या.) जि.वर्धाधावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. आणि क्षणार्धात संपूर्ण बसला आगीने वेढले. यात ५  प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले गेले. अंगावर शहारे आणणारी  ही घटना गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर  येथून दोन कि.मी.वरील सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली. एसी शॉट झाल्याने ही घटना  घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मृतांपैकी केवळ दोघांची ओळख पटली असून  तिघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींपैकी एकावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात  उपचार सुरु असून सात जणांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. दोघांना  उपचारानंतर सुटी देऊन  पाच जणांना नागपूरला हलविण्यात आले.    बाबा ट्रॅव्हल्सची एम.एच. ३१ सी.व्ही. २७७९ ही ट्रॅव्हल्स सुमारे ४0 प्रवासी घेऊन जळगाव येथून  नागपूरला जात होती. पहाटे ४.४५ च्या सुमारास तळेगाव येथून नागपूरकडे जाण्यास निघाली  असता सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जैन मंदिरासमोर या ट्रॅव्हल्सने अचानक पेट  घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण बसला  विळखा घातला. आगीचे रौद्र रुप पाहून प्रवासी जिवाच्या  आकांताने ओरडू लागले. चालकाने बस थांबविली. काही प्रवासी खिडकी व दारातून बाहेर पडले.  यातील पाच प्रवासी झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांचा जागीच  होरपळून मृत्यू  झाल्याचे प्रत्यक्षदश्रींंंंचे म्हणणे आहे. बसमधून बाहेर पडलेले काही प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील  नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना कारंजा, आर्वी व नागपूर येथे उपचारार्थ हलविले.  बसमध्ये अडकलेल्या पाचही जणांचा अक्षरश: कोळसा झाला होता. पाच मृतकांपैकी दोघांची  ओळख पटली आहे. यात सुनील सच्चिदानंद पाल  रा. मटकापूर (बिहार) यांचा नऊ महिन्याचा  मुलगा आदित्य व २८ वर्षीय पत्नी श्‍वेता यांचा समावेश आहे. उर्वरित तीन मृतकांची अद्याप  ओळख पटलेली नाही. जखमी आशिष गणपत लिलोरिया (३८) रा. प्रतापनगर नागपूर, दिवांशू चक्रधर भगवन (१0)  रा. जळगाव, आकाश शशिकांत जैन (२३) रा. जळगाव, प्रताप प्रभाकर जोशी (४१) रा.  जळगाव, संदीप ज्ञानेश्‍वर वंजारी (३0) रा. जामनेर नागपूर यांना कारंजा येथील रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. तेथे प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. सुनील  पाल यांच्यावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुभाष कोटंगळे (३५),  पूनम कोटंगळे व मयंक रामेश्‍वर शुक्ला (२७) रा. नागपूर यांनी कारंजा रुग्णालयात उपचार  करुन  सुटी घेतली. किरकोळ जखमींमध्ये अमितकुमार सोनी (३७) रा. रायपूर, राजेश अग्रवाल (५३) रा. रायपूर,  अतुल रमेशराव घाटे (४२) रा. नागपूर, विष्णू किसनराव सूर्यवंशी (३१) रा. नागपूर, प्रवीण  कानोरे (३१) रा. नागपूर आदींचा समावेश आहे. बसचालक राजेश व क्लिनर घटनास्थळारून  पळून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी बोरडे, आष्टी व कारंजा येथील ठाणेदार घटनास्थळी  हजर होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डोळ्यादेखत कुटुंबाची राखरांगोळीसुनील सच्चिदानंद पाल हा पेप्सिको कंपनीत कार्यरत आहे. त्याचे नागपूरला स्थानांतर झाले. पत्नी  श्‍वेता व मुलगा आदित्यला घेऊन तो या बसने नागपूरला जात होता. त्याचे घरातील साहित्य दुसर्‍या  वाहनाने पाठोपाठ येत होते. खिडकीतून उडी घेऊन नंतर पत्नी व मुलाला बाहेर काढावे, या बेताने  तो खिडकीतून उडी घेऊन बाहेर आला. मात्र त्याने उडी घेतल्याचे पाहून त्याच्या पाठोपाठ  बसमधील प्रवाशांनीही जिवाच्या भीतीने उड्या घेणे सुरू केल्यामुळे सुनीलला पत्नी आणि मुलाला  बाहेर काढता आले नाही. तो बचावला. मात्र त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या कुटुंबाची राखरांगोळी  झाली.