शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्यातील १० ‘स्मार्ट सिटीं’साठी ५ सल्लागार

By admin | Published: October 07, 2015 5:11 AM

‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या देशभरातील ९८ शहरांपैकी ८८ शहरांसाठी नेमलेल्या ३७ सल्लागारांची नावे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने बुधवारी जाहीर केली.

नवी दिल्ली : ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या देशभरातील ९८ शहरांपैकी ८८ शहरांसाठी नेमलेल्या ३७ सल्लागारांची नावे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने बुधवारी जाहीर केली. यानुसार महाराष्ट्रातील १० ‘स्मार्ट सिटीं’चे आराखडे तयार करण्यासाठी पाच सल्लागार नेमण्यात आले आहेत.निवड झालेल्या प्रत्येक शहराला ‘स्मार्ट सिटी’चा संकल्प आराखडा तयार करण्यासाटी केंद्र सरकारने याआधीच दोन कोटी रुपये दिले आहेत. आता हे सल्लागार त्या त्या शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका व राज्य सरकारच्या देखरेखीखाली ‘स्मार्ट सिटी’चे आराखडे तयार करतील. या संकल्प योजनांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्र विकासाच्या आराखड्याखेरीज त्यासाटी लागणाऱ्या निधीची सोय कशी करणार याचाही तपशिलवार विचार केलाजाईल.केंद्र सरकारने सल्लागारांची प्रत्येक क्षेत्रासाठी पॅनेल्स तयार केली होती. निवड झालेल्या शहरांनी निविदांच्या माध्यमातून या पॅनेलमधून आपापला सल्लागार ठरविला आहे. अशा प्रकारे या महत्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र सरकारने योजलेल्या ‘स्मार्ट सिटी चॅलेंज’ या स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता राज्यातील ही १० शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून स्वत:चा कायापालट करण्याचे स्वप्न निश्चित व तपशीलवार आराखड्याच्या स्वरूपात कागदावर उतरवतील.‘स्मार्ट सिटी चॅलेन्ज’चा दुसरा टप्पा डिसेंबर-जानेवारीत होईल. त्यावेळी स्मार्ट सिटी’ होण्यासाठी निवड केलेल्या देशभरातील सर्व शहरांनी सादर केलेल्या संकल्प आराखड्यांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाईल व त्यातून केंद्राकडून यंदाच्या वित्तीय वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये देण्यासाठी २० शहरांची निवड केली जाईल. म्हणजेच राज्यातील १० पैकी कोणत्या आणि किती शहरांना यंदा केंद्राकडून पैसे मिळतील व कोणत्या शहरांना त्यासाठी पुढील चार वर्षे थांबावे लागेल हे त्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ संकल्प आराखड्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल.या शहरांना आपापले आराखडे तयार करण्यास मदत व्हावी यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने या शहरांच्या नगर प्रशासनातील अधिकारी व सल्लागार यांच्यासाठी दिल्लीत बुधवार व गुरुवार असा दोन दिवसांचा ‘आयडियाज कॅम्प’ही आयोजित केला आहे. राज्य सरकारने या प्रत्येक शहरासाठी नेमलेल्या ‘मेन्टॉर’नीही या कॅम्पमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे.(विशेष प्रतिनिधी)शहरे व त्यांचे सल्लागारबृहन्मुंबई: अलिया कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रा. लि. व जेनेसिस फिन.पुणे: मॅक्किन्सी कन्सलन्टंट्सनागपूर- क्रिसिलऔरंगाबाद: नाईट फ्रँक (इं) प्रा. लि, फोर्ट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व पीएसपी फिनान्शियल कन्सल्टंट्स प्रा. लि.नागपूर: क्रिसिलनवी मुंबई: टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि., स्पॅटियल डिसिजन्स व महा इन्फोटेक प्रा. लि.ठाणे: क्रिसिलकल्याण-डोंबिवली- क्रिसिलसोलापूर: क्रिसिलअमरावती: क्रिसिलप्रत्येक ‘स्मार्ट सिटी’साठी केंद्र सरकार पुढील पाच वर्षे प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार आहे. यासाठी केंद्राने ४८ हजार कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. राज्य सरकारनेही पुढील पाच वर्षांत या शहरांसाठी एवढ्याच रकमेची सोय करणे अपेक्षित आहे.