शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 01:43 IST

एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले.

मुंबई : कारागृहात सर्वाधिक मृत्यू आजारपणामुळे झाले असून यात, हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा कारागृहांसह एकूण ६४ कारागृहांचा यात समावेश आहे. यात पुरुष २२,८३० आणि महिला १,२६५ अशी एकूण २४ हजार ९५ कैद्यांची क्षमता असताना, ३६ हजार ७९८ कैदी या कारागृहांत आहेत. गेल्या वर्षभरात या कारागृहांत १३२ कैद्यांचा मृत्यू झाला. यात १२१ कैद्यांचा नैसर्गिक तर ११ जणांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. यात, हृदयविकाराने ४१ कैद्यांचा मृत्यू झाला.३९ कैदी पसारगेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३९ कैदी (न्यायालयीन कोठडीत असलेले) पसार झाले होते. यात कारागृहातून १३, कारागृहाबाहेरून ९ तर पोलीस कोठडीतून १७ जण पसार झाले आहेत.