शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख आदिवासींना प्रत्येकी चार हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 06:03 IST

आदिवासींना आतापर्यंत उदरनिवार्हासाठी खावटी कर्ज दिले जात होते. वषार्नुवर्षांची ही पद्धत मोडीत काढण्यात येणार आहे.

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउनच्या काळात कमालीच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठा दिलासा देणारा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्यातील १८ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रूपयांची मदत देण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार केला आहे.

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी लोकमतला सोमवारी ही माहिती दिली. १८ लाख आदिवासी कुटुंबांना तीन हजार रुपयांचा शिधा देण्यात येईल. त्यांना वेगवेगळ्या योजनांमधून तांदूळ, गहू याआधीच मिळत आहे. या व्यतिरिक्त डाळी, चहापत्ती, तेलासह ३ हजार रुपये किमतीच्या सोळा प्रकारच्या वस्तू आदिवासींना देण्यात येतील. तसेच प्रत्येक कुटुंबातील महिलेच्या नावे एक हजार रुपये देण्यात येतील. हे एक हजार रुपये बँकेत टाकण्याऐवजी टपाल कार्यालयातून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एकूण ७२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आदिवासींना आतापर्यंत उदरनिवार्हासाठी खावटी कर्ज दिले जात होते. वषार्नुवर्षांची ही पद्धत मोडीत काढण्यात येणार आहे. खावटी कर्ज द्यायचे मग आदिवासी त्याची परतफेड करू शकत नाहीत म्हणून माफ करायचे, असे दरवर्षी चालते. त्याऐवजी कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेऊन प्रत्येकी चार हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा ‘तो’ दावा फोलच्इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळांमध्ये दरवर्षी २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, असा दावा देवेंद्र फडणवीस सरकारने सातत्याने केला होता. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या दाव्यातील हवा काढली. २०१५-१६ मध्ये १३,४७४, २०१६-१७ मध्ये १६,४६३, २०१८-१९ मध्ये २,८३९, २०१९-२० मध्ये ४,२७३ विद्यार्थ्यांनाच असा प्रवेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.च्यंदा ही योजना काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. कारण राज्य शासनाने ३३ टक्के खर्चाचे बंधन टाकले आहे आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा तर संस्थाचालकांना त्यापोटी ११० कोटी रुपये द्यावे लागतील. म्हणून काही महिन्यांसाठी ही योजना थांबवण्यात आली आहे. बंद केलेली नाही.च्राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येईल. इंग्रजी माध्यमाच्या या नवीन शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहेत, त्यात तीन हजार विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळणार आहेत, असे पाडवी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना