शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उसाची ४०० वाहने रोखली

By admin | Updated: December 16, 2015 00:28 IST

रांगोळीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : ठरल्याप्रमाणे पहिली उचल देण्याची मागणी

हुपरी : शासन, शेतकरी संघटना आणि साखर महासंघाच्या संयुक्त बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार साखर कारखान्यांकडून उसाच्या एफआरपीच्या ८० टक्के प्रतिटन पहिली उचल देण्यास साखर कारखानदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी रांगोळी (ता. हातकणंगले) येथे संपूर्ण ऊस वाहतूक बंद पाडली. सुमारे ४०० हून अधिक उसाने भरलेली वाहने रांगोळी-जंगमवाडी मार्गावरील पटांगण, रस्ते, ओसाड माळरानामध्ये उभी करून ठेवल्याने या परिसराला साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्यासारखे स्वरूप आले आहे. जिथेपर्यंत नजर पोहोचेल तेथपर्यंत उसाने भरलेली ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीच दिसत आहेत. साखर कारखान्यांकडून उसाची पहिली उचल एफआरपीच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता केवळ १७०० रुपयेच जमा करण्यात येत असल्याची माहिती रांगोळीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रात्री गावातील हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच परिसरातील सर्वच मार्गांवरून सुरू असणारी साखर कारखान्यांची वाहतूक रोखून धरत बंद पाडली. रात्रीपासून अखंडपणे जागे राहून सर्व वाहने रांगोळी-जंगमवाडी मार्गावरील मोकळी पटांगणे, रस्ते, ओसाड माळरानावरती उभी करण्यास भाग पाडले. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ४०० हून अधिक वाहने आंदोलनस्थळी उभी होती. शेतकऱ्यांची रक्कम आदा करावी, अन्यथा ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा देणारे निवेदन परिसरातील साखर कारखान्यांना १३ डिसेंबरला दिले होते. तरीही कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन १७०० रुपयेच जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे संघटनेतर्फे सोमवारी रात्रीपासूनच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडली आहे, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली. ते म्हणाले, परिसरातील जवाहर-२५३८, दत्त शिरोळ-२५२६, पंचगंगा-२६०३, शरद नरंदे-२५६३, गुरुदत्त-२६२७, शाहू कागल-२५८६, मंडलिक-२६६७ अशी एफ.आर.पी.ची रक्कम या कारखान्यांनी निश्चित केली आहे. या रकमेच्या ८० टक्के म्हणजे साधारण २००० ते २१०० रुपयांची पहिली उचल या कारखान्यांनी जमा करणे गरजेचे असताना प्रतिटन केवळ १७०० रुपये जमा करण्याचा घाट घातला आहे. नियमाप्रमाणे रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावीर पाटील, जयवंत सादळे, प्रफुल्ल मगदूम, संतोष पाटील, सुदर्शन पाटील, यवगोंडा पाटील, राजकुमार पाटील, एम. आर. पाटील, सातगोंडा हुन्नरगे, सचिन पाटील, सुरेश देसाई, दीपक पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. स्वाभिमानी आजपासून कारखाने बंद पाडणारकोल्हापूर/ पुणे : जे कारखाने मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्याप्रमाणे ‘एफआरपी’च्या ८० टक्के रकमेनुसार शेतकऱ्यांना ऊस बिले देणार नाहीत, ते कारखाने आज, बुधवारपासून बंद पाडण्याचा निर्णय पुण्यात पत्रकार भवनमध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. नेते शरद जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिथेच जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक घेतली.या बैठकीस सदाभाऊ खोत, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालंदर पाटील, सावकार मादनाईक, सागर हिप्परगे, जनार्दन पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कारखाने बंद पाडले तर नुकसान शेतकऱ्यांचेच होते, म्हणून यावर्षी संघटनेने ऊस वाहतूक रोखण्याचे व कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन केले नाही. तरीही कारखानदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची ऊस बिले द्यायला तयार नाहीत. हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी बिले दिलेली नाहीत. त्यामुळे आता संघटनेने आक्रमक पवित्रा घ्यावा व कारखाने बंद पाडल्याने होणाऱ्या परिणामांचा विचार न करता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे चार पैसे जास्त मिळावेत, या उद्देशानेच आम्ही आंदोलन करीत आहोत. ऊस, ऊस वाहतूक करणारी वाहने, चालक अशी संपूर्ण मालमत्ता ही शेतकऱ्यांचीच असून, वाहनाला व चालकांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेत आहे. आंदोलनस्थळी असणारे ड्रायव्हर-क्लिनर यांच्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची सोय केली आहे. - प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेट्टी यांची आयुक्तांशी चर्चादरम्यान, ही बैठक होण्यापूर्वी खासदार शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचीही भेट घेतली व शासनाने या आंदोलनात बघ्याची भूमिका घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून संघटनेची ताकद दाखवावी लागेल, असे स्पष्ट केले. त्याची दखल घेऊनच आयुक्तांनी सर्व कारखान्यांची बैठक बोलाविल्याचे त्यांना सांगितले.