शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

महाराष्ट्राला देणार ४०० कोटींची मोफत वीज

By admin | Updated: October 6, 2014 00:59 IST

सन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली

मोदींचे आश्वासन : गोंदियातील सभेत एकहाती सत्ता देण्याचे आवाहनगजानन चोपडे/मनोज ताजणे - गोंदियासन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली असती तर वर्षाकाठी महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची मोफत वीज मिळाली असती. भाजपाचे शासन केंद्रात येताच या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज दरवर्षी मोफत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित भरगच्च प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यालगतची छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्ये विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडी शासनाने सबंध महाराष्ट्राला पोखरून टाकले आहे. छत्तीसगड राज्यात होत असलेला विकास पूर्ण बहुमत असल्याने शक्य होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत पूर्ण बहुमताचे शासन येणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलणे शक्य होणार नाही. राज्यात वीज, पाणी आणि रोजगार या समस्या आ वासून असताना आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात कोणत्याही समस्येचे निवारण केले नाही. परिणामी क्रमांक एक वर असलेला महाराष्ट्र आज माघारला आहे. महाराष्ट्रात विकासाची दारे पुन्हा उघडायची असेल तर एकहाती सत्ता असणे हाच एकमेव उपाय आहे. दरवर्षी महाराष्ट्रात ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला असताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पाझर फुटला नाही. ६० वर्षांपासून सत्तासुख भोगणारे काँग्रेसचे नेते मला ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. हा हिशेब आपण जनतेला देणार असून जनताच आपली हायकमांड असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन ‘दल’ असले तरी त्यांचे ‘दिल’ एकच आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे इरादे सारखेच आहेत. गेल्या ६० वर्षात त्यांनी जेवढे लुटायचे तेवढे लुटले, पण आता तुमच्या भाग्याचा फैसला करण्याची वेळ आली आहे, असे म्हणून भाजपला स्पष्ट बहुमताने निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सायंकाळी ५.१५ वाजता पंतप्रधानांचे वायुसेनेच्या विशेष विमानाने गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. तेथून थेट ते सभास्थळी पोहोचले. यावेळी संपूर्ण खचाखच भरलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील नागरिकांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी मंचावर मध्य प्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन, गोंदिया-भंडाराचे खासदार नाना पटोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. चतुर आहेत शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदराव अत्यंत चतुर राजकारणी आहेत. महाराष्ट्राची जनता आता आपल्याला स्वीकारणार नाही, हे हेरुन स्वत: राज्यसभेत गेले आणि प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा बनवीत लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले, अशी फिरकीही मोदी यांनी आपल्या विशेष शैलीतून घेतली. खांद्यावर बंदूक नव्हे, नांगर उचलानक्षलग्रस्त गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी नक्षल चळवळीत दाखल न होता आपल्या देशाच्या विकास कार्यात हातभार लावायला हवा. कुठल्याही देशाचा विकास हिंसेतून होत नाही. त्यामुळे खांद्यावर बंदूकीेऐवजी नांगर उचलण्याचे आवाहन मोदी यांनी युवकांना केले.