शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

महाराष्ट्राला देणार ४०० कोटींची मोफत वीज

By admin | Updated: October 6, 2014 00:59 IST

सन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली

मोदींचे आश्वासन : गोंदियातील सभेत एकहाती सत्ता देण्याचे आवाहनगजानन चोपडे/मनोज ताजणे - गोंदियासन २००५ पासून गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पावरील विस्तारित नर्मदा परियोजनेला केंद्र शासनाने मान्यता दिली नाही. याचा फटका गुजरातसोबत महाराष्ट्रालाही बसला आहे. जर केंद्राने मान्यता दिली असती तर वर्षाकाठी महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची मोफत वीज मिळाली असती. भाजपाचे शासन केंद्रात येताच या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात महाराष्ट्राला ४०० कोटी रुपयांची वीज दरवर्षी मोफत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. गोंदियातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित भरगच्च प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यालगतची छत्तीसगड, मध्य प्रदेश ही राज्ये विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मात्र गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडी शासनाने सबंध महाराष्ट्राला पोखरून टाकले आहे. छत्तीसगड राज्यात होत असलेला विकास पूर्ण बहुमत असल्याने शक्य होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत पूर्ण बहुमताचे शासन येणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलणे शक्य होणार नाही. राज्यात वीज, पाणी आणि रोजगार या समस्या आ वासून असताना आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात कोणत्याही समस्येचे निवारण केले नाही. परिणामी क्रमांक एक वर असलेला महाराष्ट्र आज माघारला आहे. महाराष्ट्रात विकासाची दारे पुन्हा उघडायची असेल तर एकहाती सत्ता असणे हाच एकमेव उपाय आहे. दरवर्षी महाराष्ट्रात ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबविला असताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना पाझर फुटला नाही. ६० वर्षांपासून सत्तासुख भोगणारे काँग्रेसचे नेते मला ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. हा हिशेब आपण जनतेला देणार असून जनताच आपली हायकमांड असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन ‘दल’ असले तरी त्यांचे ‘दिल’ एकच आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे इरादे सारखेच आहेत. गेल्या ६० वर्षात त्यांनी जेवढे लुटायचे तेवढे लुटले, पण आता तुमच्या भाग्याचा फैसला करण्याची वेळ आली आहे, असे म्हणून भाजपला स्पष्ट बहुमताने निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सायंकाळी ५.१५ वाजता पंतप्रधानांचे वायुसेनेच्या विशेष विमानाने गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. तेथून थेट ते सभास्थळी पोहोचले. यावेळी संपूर्ण खचाखच भरलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील नागरिकांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी मंचावर मध्य प्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन, गोंदिया-भंडाराचे खासदार नाना पटोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. चतुर आहेत शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदराव अत्यंत चतुर राजकारणी आहेत. महाराष्ट्राची जनता आता आपल्याला स्वीकारणार नाही, हे हेरुन स्वत: राज्यसभेत गेले आणि प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा बनवीत लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविले, अशी फिरकीही मोदी यांनी आपल्या विशेष शैलीतून घेतली. खांद्यावर बंदूक नव्हे, नांगर उचलानक्षलग्रस्त गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी नक्षल चळवळीत दाखल न होता आपल्या देशाच्या विकास कार्यात हातभार लावायला हवा. कुठल्याही देशाचा विकास हिंसेतून होत नाही. त्यामुळे खांद्यावर बंदूकीेऐवजी नांगर उचलण्याचे आवाहन मोदी यांनी युवकांना केले.