शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

चांदी ४० हजारांवर!

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध किलो चांदी ४० हजारावर पोहोचली. चार वर्षांतील सर्वाधिक घसरण असून शनिवारी भाव एक हजार रुपयांनी कमी झाले.

सोने २७ हजाराच्या आत : बाजारात निरुत्साहनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध किलो चांदी ४० हजारावर पोहोचली. चार वर्षांतील सर्वाधिक घसरण असून शनिवारी भाव एक हजार रुपयांनी कमी झाले. चांदीचे भाव नोव्हेंबर २०१० मध्ये ४० हजारांवर होते. डिसेंबर २०१३ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. तसेच दागिने तयार करण्यासाठी आवश्यक असलेले २२ कॅरेट सोन्याचे भाव पहिल्यांदाच २६,९३५ रुपयांवर स्थिरावले. पितृपक्षात दोन्ही मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी ग्राहक नसल्याने बाजारात निरुत्साह असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात सोन्याचे भाव तोळ्यामागे ११०० रुपयांनी कमी झाले तर चांदी तब्बल २७०० रुपयांनी उतरली. याशिवाय गेल्या आठवड्यात सोने ३७५ रुपये तर चांदीत २७०० रुपयांची घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक बाजारपेठेत खरेदीदार नसल्याने सोन्याच्या मागणीत घट झाली असून बाजारात निरुत्साह आहे. पितृपक्षात सोन्याची खरेदी जवळपास बंद असून बुकिंग सुरू असल्याचे सराफांनी सांगितले.आठवड्यात ३७५ रु.ची घसरणगेल्या आठवड्यात दोन दिवस वगळता चार दिवस सोन्याच्या भावात घसरण झाली. संपूर्ण आठवड्यात सोन्याचे भाव तोळ्यामागे ३७५ रुपयांनी उतरून २७,१८५ रुपयांवर स्थिरावले. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी शुद्ध सोने ६० रुपयांची वधारले. मंगळवारी पुन्हा ४० रुपयांची घसरण होऊन भावपातळी २७,६०० रुपयांवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारी सोने ५० रुपयांनी घसरले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने २२५ रुपयांनी उतरले. शुक्रवारीसुद्धा भाव ९० रुपयांनी कमी होऊन २७,२६५ रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोन्याचे भाव ८० रुपयांनी उतरले. त्यादिवशी २४ कॅरेट सोने २७,१८५ रुपये, २३ कॅरेट २६,९३५ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २६,६८५ रुपयांपर्यंत खाली आहे. वर्षभरापूर्वी शुद्ध सोने २६,६०० रुपयांपर्यंत खाली उतरले होते. त्यावेळी ग्राहकांना दिलासा मिळाला होता. या पातळीपर्यंत सोने खाली उतरेल, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. ग्राहकांना खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. याशिवाय शुद्ध चांदी किलोमागे १५०० रुपयांनी कमी होऊन भाव ४०,७०० रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घट होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. पितृपक्षामुळे ग्राहकांनी खरेदी थांबविल्याचे सराफांनी सांगितले. (प्रतिनिधी)दोन शहरात ६८५ रु.ची तफावत!नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रचंड तफावत आहे. शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या भावात ६८५ रुपयांचा फरक होता. नागपुरात २७,१८५ रुपये तर मुंबईत २६,५०० रुपये भाव होता. फरकामुळे ग्राहकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. संपूर्ण देशात एकाच भाव असावा, असा ग्राहकांचा आग्रह असतो. दोन शहरातील भावांमध्ये तफावत नेहमीच असते, ही बाब सत्य असली तरीही इतवारी बाजारात प्रत्येक दुकानात भाव वेगवेगळे असतात, हेसुद्धा तेवढेच खरे. सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनुसार बाजारात भाव एकसमान ठेवणे आमच्या हातात नाही. वायदा बाजारामुळे भाव कमी-जास्त होत असतात.