शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:02 IST

२०१९ मध्ये चार वादळे : सागरी आपत्ती जाहीर करण्याची मच्छीमारांची मागणी

सागर नेवरेकर 

मुंबई : वातावरण बदलामुळे गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे येऊन धडकली. या वर्षी समुद्रात चार मोठी वादळे येऊन गेली. या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित सागरी मासेमारी आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

समुद्रात या पूर्वी १० वर्षांमध्ये चार ते पाच वादळे येत होती, परंतु २०१० ते २०१९ दरम्यान अरबी समुद्रात १७ वादळे येऊन गेली, तर फक्त २०१९ मध्ये अरबी समुद्रात एकूण चार वादळे येऊन गेली. एकाच वेळी समुद्रात दोन वादळे ही १२५ वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर, या वर्षी अरबी समुद्रात ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी दोन वादळे एकाच वेळी धडकली. या वादळांमुळे शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांचेही नुकसान झाले असून, आॅगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडला आहे. त्यामुळे मच्छीमारांवर आर्थिक आपत्ती ओढावली गेली आहे. शासनाने मच्छीमार बांधवांच्या आर्थिक नुकसानाकडे लक्ष देऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार संस्था व संघटनांनी केली आहे.अद्याप ठरवले नाहीत निकषजागतिक तापमानात वाढीमुळे अनेक नैसर्गिक संकटे एकापाठोपाठ येऊन धडकत आहेत. मनुष्यच कुठेतरी याला जबाबदार आहे. अरबी समुद्रात जी मोठी वादळे निर्माण होत आहेत. ती पूर्वी पॅसिफिक महासागरात दिसून यायची. या वर्षी अरबी समुद्रात चार मोठी वादळे भारतीय भूखंडामध्ये येऊन गेली आहेत. चार वादळांपैकी तीन वादळे ही हंगामामध्येच येऊन गेली आहेत. त्यामुळे मच्छीमारावर उपासमारीची वेळ आली आहे. दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईची फक्त चर्चा केली जाते. मात्र, अद्यापही कोणतेही निकष, श्रेणी ठरविले गेलेले नाहीत.- हेमंत गौरीकर, अध्यक्ष,रायगड जिल्हा मच्छीमार कृती समिती.अरबी समुद्रात आलेली शतकातील वादळेवर्षे वादळांचीसंख्या१८०० ५१९००-४९ १०१९५० ३१९६० ६१९७० १११९८० २१९९० ६२००० ५२०१०-१९ १७उपासमारीची वेळराष्ट्रीय मच्छीमार परिक्षेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, मच्छीमारांसाठीच्या सुविधा, विविध योजना, आर्थिक मदत आणि विकास इत्यादींमध्ये काळानुसार बदल होत गेले, परंतु जास्त व्याज आकारणाऱ्या योजनेतून कित्येक मच्छीमार भरडले गेले. आता अरबी समुद्रात पाठोपाठ येणाºया वादळांमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वादळाची चाहुल लागली की, अगोदरच हवामान खाते आणि कोस्ट गार्ड मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखतात, तसेच मच्छीमारांच्या मोबाइलवर मेजेस पाठवितात. नैसर्गिक आपत्ती काळात ज्या शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात, तशा मच्छीमारांसाठी कोणत्याही सुविधा सरकारकडून दिल्या जात नाहीत. 

टॅग्स :MumbaiमुंबईCyclone Gajaगाजा चक्रीवादळ