शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३९ केंद्रे

By admin | Updated: February 28, 2017 02:44 IST

करिअरचा टर्निंग पॉर्इंट ठरणाऱ्या १२ वीच्या परीक्षा मंगळवार, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.

अलिबाग : करिअरचा टर्निंग पॉर्इंट ठरणाऱ्या १२ वीच्या परीक्षा मंगळवार, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. रायगड जिल्ह्यातील ३९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. ३४ हजार ९८७ परीक्षार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ या कालावधीमध्ये १२ वीच्या परीक्षा पार पडणार आहेत, तर ७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. पूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचा विद्यार्थ्यांसह पालकांवर प्रचंड ताण यायचा मात्र आता तो विशेष करून दिसून येत नाही. अलिबाग को.ए.सो. जे.एस.एम महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी आपापली बैठक व्यवस्था कोठे आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. शाळा व्यवस्थापनांनी आपापल्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये आसन व्यवस्था केलेली आहे. तेथील बैठक क्रमांक दुपारपर्यंत टाकून झाले होते. रायगड जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी तब्बल ३४ हजार ९८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखेचे ११ हजार ४७९, कला शाखेचे १० हजार १७, वाणिज्य शाखेचे १२ हजार ४१० आणि एमसीव्हीसीच्या ९८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला भरारी पथकाचा प्रामुख्याने समावेश केला आहे. पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहा भरारी पथके संपूर्ण जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये १५ परिरक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. फक्त तळा तालुक्यामध्ये एकही परिरक्षण केंद्र स्थापण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)>मुरुडमधील ९४८ विद्यार्थी देणार परीक्षाआगरदांडा : बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू होणार आहे. मुरु ड तालुक्यातील एकूण ९४८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मुरु ड येथील सर एस.ए. हायस्कूलमधून ६७० विद्यार्थी तर मुरु ड अंजुमन इस्लाम हायस्कू लमधून १९४ विद्यार्थी, नांदगाव येथील छत्रपती नूतन यशवंत नगर कनिष्ठ विद्यालयातून ८४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुरु ड शहरातील सर एस.ए. हायस्कू लव अंजुमन इस्लाम हायस्कू लया केंद्रामध्ये या परीक्षा होणार आहेत. या सर्व शाळांची पूर्ण तयारी झाली आहे, असे यावेळी सर एस.ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक थोरवे यांनी सांगितले, तसेच या परीक्षा १८ मार्चपर्यंत असणार आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये महिला भरारी पथकाचा प्रामुख्याने समावेश केला आहे.