शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंंबई @ ३८ अंश; उष्णतेच्या लाटेचा तडाखा

By admin | Updated: February 26, 2017 04:16 IST

कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान

मुंबई : कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान असून, रविवारी, सोमवारी मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. परिणामी मुंबईकरांचा घाम निघणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. रत्नागिरीचे तापमान ३९.३ नोंदवण्यात आले आहे. सर्वसाधारण तापमानापेक्षा रत्नागिरीच्या तापमानात ८.५ अंशाची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे येथील उच्च तापमान असून, २५ फेब्रुवारी १९४५ रोजी रत्नागिरीचे तापमान ३८.३ अंश नोंदवण्यात आले होते. दुसरीकडे भिरा येथेही कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार भिरा येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वेंगुर्ला येथेही कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुंबईत मागच्या वर्षी फेब्रुवारीत ३३.२ अंश कमाल तापमान होते. तसेच शुक्रवार २५ फेब्रुवारी २०१७ रोजी कमाल तापमान ३५ अंश होते.एका दिवसांत ते तीन अंशांनी वाढल्याने उष्णतेच्या लाटेत मुंबईकर होरपळू लागले आहेत.