शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मुंंबई @ ३८ अंश; उष्णतेच्या लाटेचा तडाखा

By admin | Updated: February 26, 2017 04:16 IST

कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान

मुंबई : कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान असून, रविवारी, सोमवारी मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. परिणामी मुंबईकरांचा घाम निघणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. रत्नागिरीचे तापमान ३९.३ नोंदवण्यात आले आहे. सर्वसाधारण तापमानापेक्षा रत्नागिरीच्या तापमानात ८.५ अंशाची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे येथील उच्च तापमान असून, २५ फेब्रुवारी १९४५ रोजी रत्नागिरीचे तापमान ३८.३ अंश नोंदवण्यात आले होते. दुसरीकडे भिरा येथेही कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार भिरा येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वेंगुर्ला येथेही कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुंबईत मागच्या वर्षी फेब्रुवारीत ३३.२ अंश कमाल तापमान होते. तसेच शुक्रवार २५ फेब्रुवारी २०१७ रोजी कमाल तापमान ३५ अंश होते.एका दिवसांत ते तीन अंशांनी वाढल्याने उष्णतेच्या लाटेत मुंबईकर होरपळू लागले आहेत.