शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गावचे रस्ते होणार चकचकीत; ३७ हजार किमीचे नवे रस्ते, ७ हजार किमीचे मार्ग होणार सिमेंटचे

By यदू जोशी | Updated: February 11, 2024 07:47 IST

३० हजार किमीचे रस्ते सार्वजिनक बांधकाम विभागाच्या धर्तीवर हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार ग्रामविकास विभागाकडून बांधले जातील. 

मुंबई : राज्यात ३७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधण्याची मोठी योजना महायुती सरकार राबविणार आहे. त्यातील ३० हजार किमीचे रस्ते हे हायब्रीड ॲन्युटीनुसार व सात हजार किमीचे सिमेंट रस्ते बांधले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने या  बाबतची योजना आखली आहे.  राज्यात ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग मिळून २ लाख ९७ हजार किमी लांबीचे रस्ते हे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. पंतप्रधान ग्रामीण रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात त्यातील ३२ हजार किमीचे रस्ते बांधण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ३० हजार किमीचे रस्ते बांधणे सुरू झाले. सध्याच्या महायुती सरकारने आणखी १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे आता सुरू केली आहेत. आणखी सात हजार किमीचे रस्ते बांधण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच येणार आहे. 

सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळेसात हजार किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे (व्हाइट टॉपिंग) असतील. त्यामुळे ते अनेक वर्षे खराब होणार नाहीत. इतक्या मोठ्या लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल. काँक्रीटच्या रस्त्यासाठी साधारणत: किलोमीटरमागे १.५२ कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे सात हजार किमीसाठी अंदाजे १०,७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. डांबर रोड बांधण्यासाठीचा खर्च किमीमागे एक कोटी रुपये इतका येतो. 

‘हायब्रीड ॲन्युटी’ काय?३० हजार किमीचे रस्ते सार्वजिनक बांधकाम विभागाच्या धर्तीवर हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार ग्रामविकास विभागाकडून बांधले जातील. या मॉडेलमध्ये ५० टक्के निधी सरकार देते. उर्वरित ५० टक्के निधी हा कंत्राटदार टाकतो आणि रस्ते बांधल्यानंतरच्या दहा वर्षांत कंत्राटदाराला सरकार व्याजासह त्याची रक्कम परत करते. या दहा वर्षांत रस्त्यांची देखभाल कंत्राटदार करतो.  राज्यात सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य महामार्ग येतात. त्यांची लांबी ९७ हजार किमी इतकी आहे. 

२.९७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते राज्यात आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याच्या तक्रारी येतात. त्यावर हे रस्ते नव्याने आणि मजबूत बांधणे हाच पर्याय असून त्या दृष्टीने वेगाने काम केले जाईल. - गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

राज्यात पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेची स्थिती

पहिल्या टप्प्यात काम झाले ३२,००० किमी

दुसऱ्या टप्प्यात काम झाले ३०,००० किमी

तिसऱ्या टप्प्यात काम सुरू १०,००० किमी

लवकरच मंजुरी मिळणार ७,००० किमी

एकूण ७९,००० किमी 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक