शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रवेशासाठी ३४ हजार विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी

By admin | Updated: July 13, 2017 00:56 IST

अकरावीच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी बुधवार अखेरपर्यंत केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अकरावीच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी बुधवार अखेरपर्यंत केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ पर्यंतच प्रवेशाची मुदत शिल्लक असताना ३३ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही. पहिल्या पंसतीक्रमाचे महाविद्याय मिळालेल्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश घ्यावाच लागेल; अन्यथा ते प्रक्रियेतून बाहेर पडतील. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या दिवशीही सर्वच महाविद्यालयांमध्ये मोठी गर्दी झालेली होती. बहुतांश महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी विशेष व्यवस्था केलेली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी प्रवेशाला वेग आल्याचे चित्र महाविद्यालयांमध्ये दिसून आले. बुधवारी सायंकाळपर्यंत प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ १४ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये कला शाखेच्या १,४३३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ७५१, एमसीव्हीसीच्या २९८, तर विज्ञान शाखेच्या ६,८२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूण ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले, तर १०९ जणांना कागदपत्रांतील त्रुटीमुळे प्रवेश नाकारण्यात आला आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे अर्ज केले होते. >महाविद्यालयांच्या प्रवेशाचा कटआॅफ वाढूही शकेलअकरावीच्या गुणवत्ता यादीनुसार अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र, आपल्याला हवे असलेलेच महाविद्यालय मिळावे, यासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश न घेता थांबण्याचा विचार ते करीत आहेत. पुढच्या फेरीत कटआॅफ आणखी कमी होण्याची अपेक्षा ते करीत आहेत. मात्र, यंदा अकरावीच्या प्रवेशाची प्रत्येक फेरी स्वतंत्रपणे राबविली जात आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या रिक्त जागा व विद्यार्थ्यांची मागणी, यानुसार महाविद्यालयांचे कटआॅफ पुढच्या फेरीत वाढू शकण्याचीही शक्यता आहे, याचाही विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.>प्रवेशाची प्रवर्गानुसार यादी लावावीअकरावी प्रवेशाची महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादी लावताना सर्वसाधारण प्रवर्ग, एसी, एसटी, ओबीसी यांची एकत्रित यादी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. ती यादी सर्वसाधारण, एसी, एसटी, ओबीसी अशी स्वतंत्रपणे लावण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.>आज ११ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागेलअकरावीसाठी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. पहिल्या फेरीत पहिल्या १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. त्यापैकी ९ हजार २४३ विद्यार्थींनी आतापर्यंत प्रवेश घेतलेले आहेत. उर्वरित १० हजार ७४८ विद्यार्थ्यांना आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घ्यावाच लागेल, अन्यथा त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागणार आहे.>गुणांत बदल करून मिळेलकलागुणांचे वाढीव गुण निकालानंतर मिळाल्यामुळे गुणांत बदल झाला असल्यास त्याबाबतचे राज्य मंडळाचे पत्र घेऊन आल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयात अकरावीच्या अर्जातील गुणांत बदल करून दिला जात आहे. त्याचबरोबर, इतर बोर्डाच्या ग्रेडचे मार्कात रूपांतरही या कार्यालयातून केले जात आहे.