शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:27 AM

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे.

मुंबई : नवजात बालकांना काविळीची लस देणे गरजेचे असते. केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ टक्के नवजात बालक या लसीकरणापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे. ग्रामीण भागात ३९ टक्के तर शहरी भागात १० टक्के लोक लसीकरण करून घेत नसल्याचे आढळून आले आहे. अहमदनगरमध्ये ४० हजार ९३३, नाशिकमध्ये ३२ हजार ६०९ आणि ठाण्यात ३१ हजार २९५ बालके या लसीकरणापासून वंचित राहिली आहेत.काविळीकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून लिव्हर सिरोसिस, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. मुंबईत खासगी रु ग्णालये, प्रसूतिगृहे, महापालिका अथवा सरकारी आरोग्यकेंद्रांत ज्या बाळाचा जन्म होईल, त्या बाळांना जन्मल्यानंतर २४ तासांच्या आत काविळीची प्रतिबंधक लस देण्यात येते. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी अतिरिक्त पैसे आकारणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना लसीकरणाचा खर्च न परवडणे, लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज आणि सरकारी, खासगी रुग्णालयांत लसींचा तुटवडा ही लसीकरणापासून नवजात बालके वंचित राहण्याची मुख्य कारणे आहेत.

याविषयी, डॉ. संतोष शिनगारे यांनी सांगितले की, गर्भवतींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होऊ नये, याकरिता काविळीचे लसीकरण करण्यात येते. मात्र, ते बाळालाही करणे आवश्यक आहे. काविळीचा प्रकार असलेल्या हेपेटायटिस ‘बी’चे प्रमाण वाढल्यास सिरोसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे जीवितालाही धोका होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, हेपेटायटिस ‘बी’चे विषाणू उपचारानंतर पूर्णपणे नष्ट होत नाहीत, ते परतू शकतात. काही वेळा संपूर्ण जीवनभर उपचार घ्यावे लागतात. हेपेटायटिस ‘बी’पासून वाचण्यासाठी तो होऊ न देणे हाच उपाय आहे. म्हणूनच हेपेटायटिस ‘बी’वरील लस घेणे जास्त फायद्याचे आहे.