शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:27 IST

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे.

मुंबई : नवजात बालकांना काविळीची लस देणे गरजेचे असते. केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ टक्के नवजात बालक या लसीकरणापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे. ग्रामीण भागात ३९ टक्के तर शहरी भागात १० टक्के लोक लसीकरण करून घेत नसल्याचे आढळून आले आहे. अहमदनगरमध्ये ४० हजार ९३३, नाशिकमध्ये ३२ हजार ६०९ आणि ठाण्यात ३१ हजार २९५ बालके या लसीकरणापासून वंचित राहिली आहेत.काविळीकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून लिव्हर सिरोसिस, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. मुंबईत खासगी रु ग्णालये, प्रसूतिगृहे, महापालिका अथवा सरकारी आरोग्यकेंद्रांत ज्या बाळाचा जन्म होईल, त्या बाळांना जन्मल्यानंतर २४ तासांच्या आत काविळीची प्रतिबंधक लस देण्यात येते. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी अतिरिक्त पैसे आकारणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना लसीकरणाचा खर्च न परवडणे, लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज आणि सरकारी, खासगी रुग्णालयांत लसींचा तुटवडा ही लसीकरणापासून नवजात बालके वंचित राहण्याची मुख्य कारणे आहेत.

याविषयी, डॉ. संतोष शिनगारे यांनी सांगितले की, गर्भवतींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होऊ नये, याकरिता काविळीचे लसीकरण करण्यात येते. मात्र, ते बाळालाही करणे आवश्यक आहे. काविळीचा प्रकार असलेल्या हेपेटायटिस ‘बी’चे प्रमाण वाढल्यास सिरोसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे जीवितालाही धोका होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, हेपेटायटिस ‘बी’चे विषाणू उपचारानंतर पूर्णपणे नष्ट होत नाहीत, ते परतू शकतात. काही वेळा संपूर्ण जीवनभर उपचार घ्यावे लागतात. हेपेटायटिस ‘बी’पासून वाचण्यासाठी तो होऊ न देणे हाच उपाय आहे. म्हणूनच हेपेटायटिस ‘बी’वरील लस घेणे जास्त फायद्याचे आहे.