शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:27 IST

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे.

मुंबई : नवजात बालकांना काविळीची लस देणे गरजेचे असते. केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ टक्के नवजात बालक या लसीकरणापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे. ग्रामीण भागात ३९ टक्के तर शहरी भागात १० टक्के लोक लसीकरण करून घेत नसल्याचे आढळून आले आहे. अहमदनगरमध्ये ४० हजार ९३३, नाशिकमध्ये ३२ हजार ६०९ आणि ठाण्यात ३१ हजार २९५ बालके या लसीकरणापासून वंचित राहिली आहेत.काविळीकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून लिव्हर सिरोसिस, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. मुंबईत खासगी रु ग्णालये, प्रसूतिगृहे, महापालिका अथवा सरकारी आरोग्यकेंद्रांत ज्या बाळाचा जन्म होईल, त्या बाळांना जन्मल्यानंतर २४ तासांच्या आत काविळीची प्रतिबंधक लस देण्यात येते. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी अतिरिक्त पैसे आकारणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना लसीकरणाचा खर्च न परवडणे, लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज आणि सरकारी, खासगी रुग्णालयांत लसींचा तुटवडा ही लसीकरणापासून नवजात बालके वंचित राहण्याची मुख्य कारणे आहेत.

याविषयी, डॉ. संतोष शिनगारे यांनी सांगितले की, गर्भवतींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होऊ नये, याकरिता काविळीचे लसीकरण करण्यात येते. मात्र, ते बाळालाही करणे आवश्यक आहे. काविळीचा प्रकार असलेल्या हेपेटायटिस ‘बी’चे प्रमाण वाढल्यास सिरोसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे जीवितालाही धोका होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, हेपेटायटिस ‘बी’चे विषाणू उपचारानंतर पूर्णपणे नष्ट होत नाहीत, ते परतू शकतात. काही वेळा संपूर्ण जीवनभर उपचार घ्यावे लागतात. हेपेटायटिस ‘बी’पासून वाचण्यासाठी तो होऊ न देणे हाच उपाय आहे. म्हणूनच हेपेटायटिस ‘बी’वरील लस घेणे जास्त फायद्याचे आहे.