शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

By admin | Updated: August 25, 2016 19:41 IST

देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 : देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून यात २0८ जण नायजेरियन नागरिक आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलिस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगार विदेशी नागरिकांना स्थानबध्द केल्यास त्यांना ठेवण्यासाठी स्थानबध्दता केंद्र राज्यात नाही याची उणीव व्यक्त करताना अलीकडे आग्वाद किल्ल्याचा काही भाग अशा केंद्रासाठी देण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे त्यानी सांगितले.

साळगांव येथे अलीकडेच ओबे सन्नी (३६), आगुस्तिन आनेफो (३१) व जोशुआ इझे (३२) या तीन नायजेरियन नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील व्हिसा तसेच पासपोर्ट बोगस असल्याचे मुंबईतील इमिग्रेशन केंद्र तसेच नायजेरियाचे भारतातील उच्चायुक्त कार्यालय आणि भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आढळून आले. हे तिघे सांगोल्डा येथे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या घरात भाड्याने रहात होते. भाडेकरु ठेवताना मालकाने त्यांच्याकडून ह्यसीह्ण फॉर्म भरुन घ्यायचा असतो. या तिघांच्या ह्यसीह्ण फॉर्मवरुनच चौकशी केली असता त्यांचा गुन्हा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या कलम ४६५, ४६८,४७१,४२0 कलमांखाली तसेच १९४८ च्या विदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच ह्यसीह्ण फार्म भरुन घ्यावेत. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. साळगांवच्या प्रकरणात तिघांचेही येणे- जाणे वेळी, अवेळी असायचे. अनेकदा आठ-आठ दिवस ते गायब असायचे. या तिघांचा गुन्हेगारी प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जात आहे.

स्थानबध्दता केंद्रासाठी आग्वाद किल्ल्यात जागा गुप्ता म्हणाले की, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना पोलिस महत्प्रयासाने पकडतात परंतु त्यांची मायदेशी परत पाठवणी करेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी राज्यात स्थानबध्दता केंद्र नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक राज्यांनी अशी केंद्रे उघडलेली आहेत मात्र गोव्यात अजून असे केंद्र होऊ शकलेले नाही. खासकरुन आफ्रिकन खंडातून येणारे नागरिक आपली नावे, पत्ते खोटेच देतात. ते कुठल्या राष्ट्राचे आहेत याची अनेकदा खातरजमा होत नाही.