शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

By admin | Updated: August 25, 2016 19:41 IST

देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 : देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून यात २0८ जण नायजेरियन नागरिक आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलिस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगार विदेशी नागरिकांना स्थानबध्द केल्यास त्यांना ठेवण्यासाठी स्थानबध्दता केंद्र राज्यात नाही याची उणीव व्यक्त करताना अलीकडे आग्वाद किल्ल्याचा काही भाग अशा केंद्रासाठी देण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे त्यानी सांगितले.

साळगांव येथे अलीकडेच ओबे सन्नी (३६), आगुस्तिन आनेफो (३१) व जोशुआ इझे (३२) या तीन नायजेरियन नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील व्हिसा तसेच पासपोर्ट बोगस असल्याचे मुंबईतील इमिग्रेशन केंद्र तसेच नायजेरियाचे भारतातील उच्चायुक्त कार्यालय आणि भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आढळून आले. हे तिघे सांगोल्डा येथे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या घरात भाड्याने रहात होते. भाडेकरु ठेवताना मालकाने त्यांच्याकडून ह्यसीह्ण फॉर्म भरुन घ्यायचा असतो. या तिघांच्या ह्यसीह्ण फॉर्मवरुनच चौकशी केली असता त्यांचा गुन्हा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या कलम ४६५, ४६८,४७१,४२0 कलमांखाली तसेच १९४८ च्या विदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच ह्यसीह्ण फार्म भरुन घ्यावेत. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. साळगांवच्या प्रकरणात तिघांचेही येणे- जाणे वेळी, अवेळी असायचे. अनेकदा आठ-आठ दिवस ते गायब असायचे. या तिघांचा गुन्हेगारी प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जात आहे.

स्थानबध्दता केंद्रासाठी आग्वाद किल्ल्यात जागा गुप्ता म्हणाले की, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना पोलिस महत्प्रयासाने पकडतात परंतु त्यांची मायदेशी परत पाठवणी करेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी राज्यात स्थानबध्दता केंद्र नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक राज्यांनी अशी केंद्रे उघडलेली आहेत मात्र गोव्यात अजून असे केंद्र होऊ शकलेले नाही. खासकरुन आफ्रिकन खंडातून येणारे नागरिक आपली नावे, पत्ते खोटेच देतात. ते कुठल्या राष्ट्राचे आहेत याची अनेकदा खातरजमा होत नाही.