शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

By admin | Updated: August 25, 2016 19:41 IST

देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 : देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून यात २0८ जण नायजेरियन नागरिक आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलिस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगार विदेशी नागरिकांना स्थानबध्द केल्यास त्यांना ठेवण्यासाठी स्थानबध्दता केंद्र राज्यात नाही याची उणीव व्यक्त करताना अलीकडे आग्वाद किल्ल्याचा काही भाग अशा केंद्रासाठी देण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे त्यानी सांगितले.

साळगांव येथे अलीकडेच ओबे सन्नी (३६), आगुस्तिन आनेफो (३१) व जोशुआ इझे (३२) या तीन नायजेरियन नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील व्हिसा तसेच पासपोर्ट बोगस असल्याचे मुंबईतील इमिग्रेशन केंद्र तसेच नायजेरियाचे भारतातील उच्चायुक्त कार्यालय आणि भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आढळून आले. हे तिघे सांगोल्डा येथे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या घरात भाड्याने रहात होते. भाडेकरु ठेवताना मालकाने त्यांच्याकडून ह्यसीह्ण फॉर्म भरुन घ्यायचा असतो. या तिघांच्या ह्यसीह्ण फॉर्मवरुनच चौकशी केली असता त्यांचा गुन्हा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या कलम ४६५, ४६८,४७१,४२0 कलमांखाली तसेच १९४८ च्या विदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच ह्यसीह्ण फार्म भरुन घ्यावेत. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. साळगांवच्या प्रकरणात तिघांचेही येणे- जाणे वेळी, अवेळी असायचे. अनेकदा आठ-आठ दिवस ते गायब असायचे. या तिघांचा गुन्हेगारी प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जात आहे.

स्थानबध्दता केंद्रासाठी आग्वाद किल्ल्यात जागा गुप्ता म्हणाले की, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना पोलिस महत्प्रयासाने पकडतात परंतु त्यांची मायदेशी परत पाठवणी करेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी राज्यात स्थानबध्दता केंद्र नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक राज्यांनी अशी केंद्रे उघडलेली आहेत मात्र गोव्यात अजून असे केंद्र होऊ शकलेले नाही. खासकरुन आफ्रिकन खंडातून येणारे नागरिक आपली नावे, पत्ते खोटेच देतात. ते कुठल्या राष्ट्राचे आहेत याची अनेकदा खातरजमा होत नाही.