शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सोलापुरातील ३२ हजार शेतक-यांची कर्जमाफी लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:23 IST

त्रुटी पूर्ण करून शासनाला सादर झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या व पैसे परत आलेच नाहीत.

सोलापूर : त्रुटी पूर्ण करून शासनाला सादर झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या व पैसे परत आलेच नाहीत. याशिवाय तपासणीत नव्याने त्रुटीतील चार हजार शेतक-यांची नावे अचूक झाली असून दीड लाखावरील रक्कम भरलेल्या शेतक-यांच्याही खात्यावर पैसे जमा होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५१ हजार १५५ शेतकºयांची २६५ कोटी रुपये इतकी रक्कम आतापर्यंत खात्यावर जमा झाली आहे. शासनाकडून आलेल्या ‘ग्रीन’ यादीच्या तपासणीत त्रुटी पूर्ण झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या शासनाला सादर केल्या आहेत; मात्र या याद्या बँकेला परत आल्या नाहीत व त्यासाठी पैसेही आले नाहीत. याशिवाय १० हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आली होती. ही यादी त्या-त्या विकास सोसायटीमार्फत तपासणी केली असता त्यात चार हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत.

आता ही यादी शासनाकडे जाणार आहे. याशिवाय दीड लाखावरील रक्कम भरणा-या (ओ.टी.एस.) शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. या सर्व शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून पैसे येणे आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यास शासनाची परवानगी नाही.त्रुटी पूर्ण केलेल्या याद्या दुरुस्त करून परत पाठविल्या आहेत. दीड लाखावरील रक्कम भरणा-या शेतक-यांच्या खात्यावरही कर्जमाफीची रक्कम जमा करावयाची आहे. शासनाकडून पैसे येत नसल्याने कर्जदार लटकले आहेत. आमच्याकडे शिल्लक असलेले ८ कोटीही शासनाने परत घेतले. शिल्लक असलेले सव्वादोन कोटीही जमा करण्यात परवानगी नाही.राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँकदीड लाखावरील रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करणार आहे. जिल्हा बँकेच्या २९२ शेतकºयांनी दीड लाखावरील एक कोटी ३४ लाख २३ हजार रुपये इतकी रक्कम कर्जखात्यावर भरली आहे. कर्जमाफीचे ४ कोटी ३८ लाख रुपये कर्जखात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसे देत नाही. पैसे भरणाºया शेतकºयांना नाहक व्याज भरावे लागते शिवाय पैसे भरुनही नव्याने कर्ज मिळेना झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी