शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सोलापुरातील ३२ हजार शेतक-यांची कर्जमाफी लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:23 IST

त्रुटी पूर्ण करून शासनाला सादर झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या व पैसे परत आलेच नाहीत.

सोलापूर : त्रुटी पूर्ण करून शासनाला सादर झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या व पैसे परत आलेच नाहीत. याशिवाय तपासणीत नव्याने त्रुटीतील चार हजार शेतक-यांची नावे अचूक झाली असून दीड लाखावरील रक्कम भरलेल्या शेतक-यांच्याही खात्यावर पैसे जमा होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५१ हजार १५५ शेतकºयांची २६५ कोटी रुपये इतकी रक्कम आतापर्यंत खात्यावर जमा झाली आहे. शासनाकडून आलेल्या ‘ग्रीन’ यादीच्या तपासणीत त्रुटी पूर्ण झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या शासनाला सादर केल्या आहेत; मात्र या याद्या बँकेला परत आल्या नाहीत व त्यासाठी पैसेही आले नाहीत. याशिवाय १० हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आली होती. ही यादी त्या-त्या विकास सोसायटीमार्फत तपासणी केली असता त्यात चार हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत.

आता ही यादी शासनाकडे जाणार आहे. याशिवाय दीड लाखावरील रक्कम भरणा-या (ओ.टी.एस.) शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. या सर्व शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून पैसे येणे आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यास शासनाची परवानगी नाही.त्रुटी पूर्ण केलेल्या याद्या दुरुस्त करून परत पाठविल्या आहेत. दीड लाखावरील रक्कम भरणा-या शेतक-यांच्या खात्यावरही कर्जमाफीची रक्कम जमा करावयाची आहे. शासनाकडून पैसे येत नसल्याने कर्जदार लटकले आहेत. आमच्याकडे शिल्लक असलेले ८ कोटीही शासनाने परत घेतले. शिल्लक असलेले सव्वादोन कोटीही जमा करण्यात परवानगी नाही.राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँकदीड लाखावरील रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करणार आहे. जिल्हा बँकेच्या २९२ शेतकºयांनी दीड लाखावरील एक कोटी ३४ लाख २३ हजार रुपये इतकी रक्कम कर्जखात्यावर भरली आहे. कर्जमाफीचे ४ कोटी ३८ लाख रुपये कर्जखात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसे देत नाही. पैसे भरणाºया शेतकºयांना नाहक व्याज भरावे लागते शिवाय पैसे भरुनही नव्याने कर्ज मिळेना झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी