शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:41 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने खवा, मावा, मिठाई, वनस्पती तेल-तूप अशा विविध भेसळ असलेल्या पदार्थांचा तब्बल ३० हजार ४४९ किलोचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून भेसळखोरांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत, दिवाळीच्या फराळांची मनसोक्त लज्जत चाखली जाते. या कालावधीत फराळासाठी मावायुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, याचा फायदा घेत विक्रेते भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडतात. राज्य व राज्याबाहेरून आणण्यात येणाºया मावायुक्त पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते. दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे.दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबविली जाते. सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ८२२ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. महत्त्वाची रेल्वे स्थानके व जेथे मालाची ने-आण केली जाते, अशा ठिकाणी विशेष नजर असते, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळी