शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:41 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने खवा, मावा, मिठाई, वनस्पती तेल-तूप अशा विविध भेसळ असलेल्या पदार्थांचा तब्बल ३० हजार ४४९ किलोचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून भेसळखोरांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत, दिवाळीच्या फराळांची मनसोक्त लज्जत चाखली जाते. या कालावधीत फराळासाठी मावायुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, याचा फायदा घेत विक्रेते भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडतात. राज्य व राज्याबाहेरून आणण्यात येणाºया मावायुक्त पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते. दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे.दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबविली जाते. सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ८२२ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. महत्त्वाची रेल्वे स्थानके व जेथे मालाची ने-आण केली जाते, अशा ठिकाणी विशेष नजर असते, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळी