शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 06:36 IST

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या कामगिरीबद्दल जवानांचे कौतुक करीत त्यांना सलाम केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडच्या घनदाट जंगलात घातपाताच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करून जवानांनी ३० जणांना कंठस्नान घातले. शुक्रवारी दुपारी १ वाजता सुरू झालेली चकमक रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच होती. अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई असून, माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

गडचिरोलीपासून दोनशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे. दंतेवाडा व नारायणपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील थुलथुली व नेंदूर या गावाजवळ दक्षिण अबूझमाडच्या जंगलात १७१ नक्षली दबा धरून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे अभियान राबविले. अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता सुरुवातीला सात नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, त्यानंतर नक्षल्यांनी पुन्हा जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यात आणखी काही नक्षली जवानांच्या गोळीचा निशाणा ठरले. रात्री ८ वाजेपर्यंत ३० नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी एके-४७, एसएलआरसह इतर नक्षल शस्त्रे व साहित्याचा साठा जवानांनी ताब्यात घेतला आहे. मृत नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतांत मोठ्या पदावरील नक्षल्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सर्व जवान सुरक्षित आहेत. या मोहिमेत राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव दलाच्या तसेच विशेष पथकाच्या जवानांचा समावेश होता. 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या कामगिरीबद्दल जवानांचे कौतुक करीत त्यांना सलाम केला.

चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची नेमकी संख्या अजून निश्चित नाही. एकेक मृतदेह शोधून जंगलातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृत नक्षल्यांची ओळख पटल्याशिवाय त्यांचा महाराष्ट्रातील घातपाती कारवायांत सहभाग होता किंवा नाही हे सांगता येणार नाही.     - प्रभात कुमार, पोलिस अधीक्षक, नारायणपूर, छत्तीसगड

नक्षलवाद्यांचा यंदाच्या वर्षी जवानांनी खात्मा केला आहे. दंतेवाडा आणि नारायणपूरसह बस्तर क्षेत्रातील सात जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.

गडचिरोली कनेक्शनची चौकशी सुरूअबूझमाडचे जंगल माओवाद्यांचा गड राहिला आहे. नक्षल्यांना हे जंगल सुरक्षित वाटते. गडचिरोलीतील घातपाती कारवायांची रूपरेषाही अनेकदा या जंगलात ठरलेली आहे.चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे गडचिरोली ‘कनेक्शन’ अद्याप समोर आलेले नसले तरी त्यांची ओळख पटल्यानंतर रेकॉर्ड तपासून खातरजमा केली जाईल, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सीमावर्ती भागात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेतली जात असून, नक्षल्यांनी जिल्हा हद्दीत एंट्री करू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी