शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावे वसई-विरार पालिकेतच!

By admin | Updated: January 9, 2016 04:15 IST

वसई-विरारच्या हद्दीतून २०११मध्ये वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : वसई-विरारच्या हद्दीतून २०११मध्ये वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. मात्र उच्च न्यायालयाने ही गावे समाविष्ट करून घेण्याची पुढील कार्यवाही फेब्रुवारीपर्यंत करू नये, असा आदेश राज्य सरकारला दिला आहे.या प्रकरणी न्या. अनुप मोहता व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वादग्रस्त २९ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट न करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्य सरकारने स्थानिक नेत्यांचे निवेदन आणि कोकण उपविभागीय आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आपले मत बदलले. मे २०११च्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळली. या गावांतील काही रहिवाशांनी ही गावे पुन्हा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावीत, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात येऊ नयेत, यासाठीही याचिका दाखल करण्यात आल्या.आयुक्तांची शिफारस मान्य... ‘कोकण उपविभागीय आयुक्तांनी या मुद्द्यावर जनसुनावणी घेऊन सरकारपुढे अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी संबंधित गावांचे शहरीकरण झाले असून, पुढील विकासासाठी महापालिकेच्या हद्दीत ही गावे समाविष्ट करून घेण्याची शिफारस केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य करून वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी आणि अ‍ॅड. चंद्रकांत यादव यांनी खंडपीठाला दिली.