शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावे वसई-विरार पालिकेतच!

By admin | Updated: January 9, 2016 04:15 IST

वसई-विरारच्या हद्दीतून २०११मध्ये वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : वसई-विरारच्या हद्दीतून २०११मध्ये वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करून घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. मात्र उच्च न्यायालयाने ही गावे समाविष्ट करून घेण्याची पुढील कार्यवाही फेब्रुवारीपर्यंत करू नये, असा आदेश राज्य सरकारला दिला आहे.या प्रकरणी न्या. अनुप मोहता व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वादग्रस्त २९ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट न करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्य सरकारने स्थानिक नेत्यांचे निवेदन आणि कोकण उपविभागीय आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आपले मत बदलले. मे २०११च्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळली. या गावांतील काही रहिवाशांनी ही गावे पुन्हा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावीत, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात येऊ नयेत, यासाठीही याचिका दाखल करण्यात आल्या.आयुक्तांची शिफारस मान्य... ‘कोकण उपविभागीय आयुक्तांनी या मुद्द्यावर जनसुनावणी घेऊन सरकारपुढे अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी संबंधित गावांचे शहरीकरण झाले असून, पुढील विकासासाठी महापालिकेच्या हद्दीत ही गावे समाविष्ट करून घेण्याची शिफारस केली आहे. सरकारने ही शिफारस मान्य करून वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा एकदा महापालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी आणि अ‍ॅड. चंद्रकांत यादव यांनी खंडपीठाला दिली.