शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

२७ गावांतील रस्ते लवकरच होणार रुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 03:37 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील रस्ता रुंदीकरणाचे काम आॅक्टोबरमध्ये हाती घेतले जाईल,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील रस्ता रुंदीकरणाचे काम आॅक्टोबरमध्ये हाती घेतले जाईल, असे आश्वासन आयुक्त ई. रवींद्रन यांनी नगरसेवकांना दिले. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी सोमवारी २७ गावांतील पाणी, रस्ते व विजेच्या प्रश्नावर आयुक्त रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. त्यावेळी रवींद्रन यांनी पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, नांदिवली, नांदिवली टेकडी, सागाव येथे होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या विभागातील पाणीप्रश्न सोडवण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे व २७ गावांतील नगरसेवक उपस्थित होते.२७ गावांतील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे महापालिका निधीतून हाती घेण्यात आली आहेत. परंतु, सध्याचे रस्ते खूपच अरुंद असल्यामुळे बाह्यवळण मार्गाचा पर्याय आमदार भोईर यांनी सुचवला आहे. त्याचप्रमाणे मानपाडा रोड-गांधीनगर नाल्यापासून कल्याण-शीळ रोड २४ मीटर, श्री मलंग रोड (चेतना स्कूल, नेवाळीनाक्यापर्यंत) ३० मीटर, श्री मलंग रोड-अशेळेपर्यंत डीपी रोड ३० मीटर, टाटा पॉइंट (पिंगारा हॉटेल) ते श्री मलंग रोड २४ मीटर, जय मल्हार रोड - पिसवली ते आडिवली २० मीटर, जय मल्हार रोड ते जोंधळे महाविद्यालय ३० मीटर, कल्याण-शीळ रोडपासून सोनारपाड्याचे दोन्ही रस्ते २०मीटर, कल्याण-शीळ ते उंबार्ली ते पाइपलाइन रोड ३० मीटर, मानपाडा रोड ते संदप व उसरघर ३० मीटर, मानपाडा रोड ते भोपरगाव ३०मीटर, भोपर ते कोपर स्टेशन (आयरे) १५ मीटर, मानपाडा रोड-साईबाबा मंदिर ते समर्थनगर मठ २४ मीटर, मणेरेगाव ते वसार हद्द ते एमआयडीसी अंबरनाथ रोडपर्यंत २४मीटर, व्यंकटेश पेट्रोलपंप ते रिजन्सी डीपी रोड, प्रभाग क्र मांक ८५ मधील नानासाहेब धर्माधिकारी रोड या रस्त्यांचे रु ंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यांसाठी नगरसेवक एकत्र; विजेचे जीर्ण खांबही बदलण्याची मागणीकेडीएमसीत विकासकामांसाठी नगरसेवकांनी वज्रमूठ बांधली आहे. प्रभाग क्र मांक ११२, ११३ व ११५ चे नगरसेवक एकत्र आले आहेत. डोंबिवली विभागातील युनियन बँक ते मानपाडा रोड ते रविकिरण सोसायटी, नांदिवली नाला पूल ते धनलक्ष्मी चौकापर्यंतचा रस्ता ३०मीटर करण्यात येणार आहे.यासाठी नगरसेविका रूपाली म्हात्रे, प्रेमा म्हात्रे व आशालता बाबर यांनी पुढाकार घेतला आहे. २७ गावांमधील विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. याबाबत पाहणी करून आवश्यक तेथे नवीन खांब व वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. याबैठकीला नगरसेविका म्हात्रे, बाबर, युवासेना तालुका सचिव योगेश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.