शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मुंबईतील २७ टक्के पाण्याचा हिशेब नाही

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे

मुंबई : मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे नसल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईत पाणीगळतीमुळे ७०० दशलक्ष लीटर तर १६० दशलक्ष लीटर पाण्याची टँकर लॉबीकडून चोरी होते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना भाई गिरकर, राहुल नार्वेकर, आनंद ठाकूर, हेमंत टकले आदी सदस्यांनी मांडली. यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले की, ‘महापालिकेच्या विशेषत: मुंबई शहरातील जलवाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १५० किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उपाययोजना करण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात ३९ हजार ९५६ गळत्या शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई उपनगरात नळजोडण्यांवर ३ लाख ७० हजार मीटर बसवलेले आहेत, तर १ लाख जोडण्यांवर मीटर नसल्याचे पाटील यांनी सांगितले.