शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील २७ टक्के पाण्याचा हिशेब नाही

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे

मुंबई : मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे नसल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईत पाणीगळतीमुळे ७०० दशलक्ष लीटर तर १६० दशलक्ष लीटर पाण्याची टँकर लॉबीकडून चोरी होते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना भाई गिरकर, राहुल नार्वेकर, आनंद ठाकूर, हेमंत टकले आदी सदस्यांनी मांडली. यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले की, ‘महापालिकेच्या विशेषत: मुंबई शहरातील जलवाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १५० किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उपाययोजना करण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात ३९ हजार ९५६ गळत्या शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई उपनगरात नळजोडण्यांवर ३ लाख ७० हजार मीटर बसवलेले आहेत, तर १ लाख जोडण्यांवर मीटर नसल्याचे पाटील यांनी सांगितले.