शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मुंबईतील २७ टक्के पाण्याचा हिशेब नाही

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे

मुंबई : मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे नसल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईत पाणीगळतीमुळे ७०० दशलक्ष लीटर तर १६० दशलक्ष लीटर पाण्याची टँकर लॉबीकडून चोरी होते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना भाई गिरकर, राहुल नार्वेकर, आनंद ठाकूर, हेमंत टकले आदी सदस्यांनी मांडली. यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले की, ‘महापालिकेच्या विशेषत: मुंबई शहरातील जलवाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १५० किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उपाययोजना करण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात ३९ हजार ९५६ गळत्या शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई उपनगरात नळजोडण्यांवर ३ लाख ७० हजार मीटर बसवलेले आहेत, तर १ लाख जोडण्यांवर मीटर नसल्याचे पाटील यांनी सांगितले.