शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

By admin | Updated: July 23, 2016 02:11 IST

शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दीड वर्षात नवी मुंबईतून २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २३० मुलींना पोलिसांनी शोधून काढले असून, त्यापैकी ९० टक्के मुली प्रेमसंबंधातून पळाल्याचे तपासात उघड झाले आहे.नेरूळ येथील स्वप्निल सोनावणे (१५) याच्या हत्येनंतर अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळांच्या बाहेर, उद्यानांत तसेच एकांत मिळेल अशा ठिकाणी अल्पवयीन युगुले दिसतात. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दीड वर्षात ३८९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी ३४२ बालकांना शोधून काढण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. २०१५ मध्ये १७२ तर चालू वर्षात ९० मुली बेपत्ता झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षात २३० बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आहे. त्यापैकी सुमारे ९० टक्के मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले आहे. १० दिवसांपूर्वीच दिघा येथील महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीचे २५ वर्षीय मुलासोबत लग्न लावले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलेने प्रेमप्रकरणात लहान मुली पळून जातात या चिंतेने तिचे लग्न लावल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे मुलांप्रमाणेच पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. >२३0 मुलींचा शोध२०१५ मध्ये १७२ मुली हरवल्या. त्यापैकी १५७ मुलींचा पोलिसांना शोध लागलेला आहे.२०१६ मध्ये जूनअखेरपर्यंत ९० मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ७३ मुलींचा शोध लागलेला आहे.