शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

By admin | Updated: July 23, 2016 02:11 IST

शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दीड वर्षात नवी मुंबईतून २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २३० मुलींना पोलिसांनी शोधून काढले असून, त्यापैकी ९० टक्के मुली प्रेमसंबंधातून पळाल्याचे तपासात उघड झाले आहे.नेरूळ येथील स्वप्निल सोनावणे (१५) याच्या हत्येनंतर अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळांच्या बाहेर, उद्यानांत तसेच एकांत मिळेल अशा ठिकाणी अल्पवयीन युगुले दिसतात. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दीड वर्षात ३८९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी ३४२ बालकांना शोधून काढण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. २०१५ मध्ये १७२ तर चालू वर्षात ९० मुली बेपत्ता झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षात २३० बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आहे. त्यापैकी सुमारे ९० टक्के मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले आहे. १० दिवसांपूर्वीच दिघा येथील महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीचे २५ वर्षीय मुलासोबत लग्न लावले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलेने प्रेमप्रकरणात लहान मुली पळून जातात या चिंतेने तिचे लग्न लावल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे मुलांप्रमाणेच पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. >२३0 मुलींचा शोध२०१५ मध्ये १७२ मुली हरवल्या. त्यापैकी १५७ मुलींचा पोलिसांना शोध लागलेला आहे.२०१६ मध्ये जूनअखेरपर्यंत ९० मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ७३ मुलींचा शोध लागलेला आहे.