शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता

By admin | Updated: July 23, 2016 02:11 IST

शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- शहरात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात कौटुंबिक ताणाबरोबरच प्रेमप्रकरणेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी व पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दीड वर्षात नवी मुंबईतून २६२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २३० मुलींना पोलिसांनी शोधून काढले असून, त्यापैकी ९० टक्के मुली प्रेमसंबंधातून पळाल्याचे तपासात उघड झाले आहे.नेरूळ येथील स्वप्निल सोनावणे (१५) याच्या हत्येनंतर अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळांच्या बाहेर, उद्यानांत तसेच एकांत मिळेल अशा ठिकाणी अल्पवयीन युगुले दिसतात. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दीड वर्षात ३८९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी ३४२ बालकांना शोधून काढण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. २०१५ मध्ये १७२ तर चालू वर्षात ९० मुली बेपत्ता झाल्या होत्या. गेल्या दीड वर्षात २३० बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आहे. त्यापैकी सुमारे ९० टक्के मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले आहे. १० दिवसांपूर्वीच दिघा येथील महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीचे २५ वर्षीय मुलासोबत लग्न लावले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलेने प्रेमप्रकरणात लहान मुली पळून जातात या चिंतेने तिचे लग्न लावल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यामुळे मुलांप्रमाणेच पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. >२३0 मुलींचा शोध२०१५ मध्ये १७२ मुली हरवल्या. त्यापैकी १५७ मुलींचा पोलिसांना शोध लागलेला आहे.२०१६ मध्ये जूनअखेरपर्यंत ९० मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ७३ मुलींचा शोध लागलेला आहे.