शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

२५०० मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Updated: July 21, 2015 01:24 IST

कोराडी, चंद्रपूर आणि परळी या तीन ठिकाणचे काम पूर्ण होत आले

मुंबई : कोराडी, चंद्रपूर आणि परळी या तीन ठिकाणचे काम पूर्ण होत आले असून, राज्याला लवकरच २५०० मेगावॅट वीज मिळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. महानिर्मितीच्या कोणत्याही वीज संचामुळे वीजनिर्मिती मंदावली नसल्याचेही ते म्हणाले. शिवाय, दाभोळ प्रकल्प बंद असला तरी तो सुरू केला जाईल आणि त्यातून मिळणारी वीज रेल्वेला सेंट्रल ग्रीडसाठी देण्याविषयी विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.वीजनिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महानिर्मितीच्या वीजसंचाची मुदत संपल्याने होणारी वीजनिर्मिती मंदावली असल्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. आमदार बसवराज पाटील, दिलीप वळसे-पाटील, संजय सावकारे, जयदत्त क्षीरसागर यांनी यावर प्रश्न विचारले. बावनकुळे म्हणाले, महानिर्मिती कंपनीच्या १७ संचांचे आयुष्य २५ वर्षांपेक्षा जास्त व ११ संचांचे आयुष्य ३० वर्षांपेक्षा जास्त आहे. चंद्रपूर केंद्रातील काही संचांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे एप्रिल २०१५मध्ये ते संच बंद होते. मात्र या संचांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ११व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महानिर्मिती कंपनीच्या २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या संचांचे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने कोराडी संच क्रमांक ६च्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पडताळणी केली जाईल व नंतर इतर संचांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)