शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

By admin | Updated: May 19, 2015 01:40 IST

संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़

प्रमोद आहेर ल्ल शिर्डीगेल्या चौदा वर्षांत साईबाबा संस्थानने शासनाच्या विविध विकास कामांसाठी तब्बल अडीचशे कोटींची मदत केली सरकारने मात्र संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर शासनाची जबाबदारी असलेल्या विकास कामांनाही संस्थान देणगीतून यथाशक्ती मदत करते़ नुकतीच संस्थानने ‘जलशिवार’साठी ३४ कोटींची मदत देऊ केली आहे़ गेल्या चौदा वर्षांत पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने तब्बल २५० कोटींचा निधी दिल्याचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ त्यातच संस्थानचे जीवनदायी योजनेचे ३८ कोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत, तर शंभर कोटींहून अधिक रक्कम संस्थानने राज्यातील हजारो गरजू रूग्णांना उपचारासाठी खर्च केली आहे़समाजोपयोगी व शासनाला पूरक कामे करत असूनही संस्थानला शासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणवणाऱ्या संस्थानच्या विकासकामांचे डझनवारी प्रस्ताव गेल्या सरकारच्या दरबारी पडून होते़ ते विश्वस्त मंडळाची नियुक्तीही करू शकले नाहीत, त्यानंतर आलेल्या सरकारने दहा महिन्यांत घोषणा देण्यापलिकडे अद्याप काही केले नाही़सिंहस्थ दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना अद्याप शिर्डीत स्थानिक पातळीवर बैठकांच्या उठबशा सुरू आहेत़ नाशिकला सिंहस्थासाठी तेवीसशे कोटींचा निधी देण्यात आला, त्यातील पन्नास टक्के भाविक शिर्डीला येण्याची शक्यता असतानाही शिर्डीला मात्र ठेंगा दाखवण्यात आला़ विश्वस्त मंडळ नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडल्या. संस्थानकडे निधी असूनही परवानग्यांच्या जंजाळात अडकल्याने भाविकांच्या समस्या कायम आहेत़ कचरा, पाणी, वाहनतळ, दर्शनबारी, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्यांनी शिर्डीला घेरले आहे.राज्य सरकारणदील निम्म्याहून अधिक मंत्री साईभक्त असतानाही साईदरबारी समस्यांचे अमाप पीक आले आहे.34 कोटींची मदत ‘जलशिवार’ योजनेसाठीदेऊ केली250 कोटींचा निधी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी दिला.38 कोटी जीवनदायी योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत