शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

By admin | Updated: May 19, 2015 01:40 IST

संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़

प्रमोद आहेर ल्ल शिर्डीगेल्या चौदा वर्षांत साईबाबा संस्थानने शासनाच्या विविध विकास कामांसाठी तब्बल अडीचशे कोटींची मदत केली सरकारने मात्र संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर शासनाची जबाबदारी असलेल्या विकास कामांनाही संस्थान देणगीतून यथाशक्ती मदत करते़ नुकतीच संस्थानने ‘जलशिवार’साठी ३४ कोटींची मदत देऊ केली आहे़ गेल्या चौदा वर्षांत पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने तब्बल २५० कोटींचा निधी दिल्याचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ त्यातच संस्थानचे जीवनदायी योजनेचे ३८ कोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत, तर शंभर कोटींहून अधिक रक्कम संस्थानने राज्यातील हजारो गरजू रूग्णांना उपचारासाठी खर्च केली आहे़समाजोपयोगी व शासनाला पूरक कामे करत असूनही संस्थानला शासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणवणाऱ्या संस्थानच्या विकासकामांचे डझनवारी प्रस्ताव गेल्या सरकारच्या दरबारी पडून होते़ ते विश्वस्त मंडळाची नियुक्तीही करू शकले नाहीत, त्यानंतर आलेल्या सरकारने दहा महिन्यांत घोषणा देण्यापलिकडे अद्याप काही केले नाही़सिंहस्थ दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना अद्याप शिर्डीत स्थानिक पातळीवर बैठकांच्या उठबशा सुरू आहेत़ नाशिकला सिंहस्थासाठी तेवीसशे कोटींचा निधी देण्यात आला, त्यातील पन्नास टक्के भाविक शिर्डीला येण्याची शक्यता असतानाही शिर्डीला मात्र ठेंगा दाखवण्यात आला़ विश्वस्त मंडळ नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडल्या. संस्थानकडे निधी असूनही परवानग्यांच्या जंजाळात अडकल्याने भाविकांच्या समस्या कायम आहेत़ कचरा, पाणी, वाहनतळ, दर्शनबारी, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्यांनी शिर्डीला घेरले आहे.राज्य सरकारणदील निम्म्याहून अधिक मंत्री साईभक्त असतानाही साईदरबारी समस्यांचे अमाप पीक आले आहे.34 कोटींची मदत ‘जलशिवार’ योजनेसाठीदेऊ केली250 कोटींचा निधी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी दिला.38 कोटी जीवनदायी योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत