शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

By admin | Updated: May 19, 2015 01:40 IST

संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़

प्रमोद आहेर ल्ल शिर्डीगेल्या चौदा वर्षांत साईबाबा संस्थानने शासनाच्या विविध विकास कामांसाठी तब्बल अडीचशे कोटींची मदत केली सरकारने मात्र संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर शासनाची जबाबदारी असलेल्या विकास कामांनाही संस्थान देणगीतून यथाशक्ती मदत करते़ नुकतीच संस्थानने ‘जलशिवार’साठी ३४ कोटींची मदत देऊ केली आहे़ गेल्या चौदा वर्षांत पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने तब्बल २५० कोटींचा निधी दिल्याचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ त्यातच संस्थानचे जीवनदायी योजनेचे ३८ कोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत, तर शंभर कोटींहून अधिक रक्कम संस्थानने राज्यातील हजारो गरजू रूग्णांना उपचारासाठी खर्च केली आहे़समाजोपयोगी व शासनाला पूरक कामे करत असूनही संस्थानला शासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणवणाऱ्या संस्थानच्या विकासकामांचे डझनवारी प्रस्ताव गेल्या सरकारच्या दरबारी पडून होते़ ते विश्वस्त मंडळाची नियुक्तीही करू शकले नाहीत, त्यानंतर आलेल्या सरकारने दहा महिन्यांत घोषणा देण्यापलिकडे अद्याप काही केले नाही़सिंहस्थ दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना अद्याप शिर्डीत स्थानिक पातळीवर बैठकांच्या उठबशा सुरू आहेत़ नाशिकला सिंहस्थासाठी तेवीसशे कोटींचा निधी देण्यात आला, त्यातील पन्नास टक्के भाविक शिर्डीला येण्याची शक्यता असतानाही शिर्डीला मात्र ठेंगा दाखवण्यात आला़ विश्वस्त मंडळ नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडल्या. संस्थानकडे निधी असूनही परवानग्यांच्या जंजाळात अडकल्याने भाविकांच्या समस्या कायम आहेत़ कचरा, पाणी, वाहनतळ, दर्शनबारी, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्यांनी शिर्डीला घेरले आहे.राज्य सरकारणदील निम्म्याहून अधिक मंत्री साईभक्त असतानाही साईदरबारी समस्यांचे अमाप पीक आले आहे.34 कोटींची मदत ‘जलशिवार’ योजनेसाठीदेऊ केली250 कोटींचा निधी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी दिला.38 कोटी जीवनदायी योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत