शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

२५ वर्षांनंतर गाव झाले ‘पाणीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:46 IST

सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे.

नंदकिशोर नारे  वाशिम : सोनगव्हाण ग्रामस्थांची गेल्या तब्बल २५ वर्षांपासून चाललेली पाण्यासाठीची वणवण सरपंचांच्या कृतिशील पुढाकारामुळे थांबली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसह विविध उपक्रम राबवून सरपंच शरद गोदारा यांनी सोनगव्हाण ‘पाणीदार’ केले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावात घामाच्या धारांसोबतच, पाटाचे पाणीही वाहात आहे.भौगोलिकदृष्ट्या सोनगव्हाण पैनगंगेच्या तिरावर वसलेले असले; तरीही हिवाळा संपताच पैनगंगेचा प्रवाह दूषित व्हायचा.गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम असे सर्वच जलस्रोत हिवाळ्यातच तळ गाठायचे.कोरडे पडणारे सोनगव्हाण कल्पक सरपंच शरद गोदारा यांच्या पुढाकाराने अडीच दशकांनंतर जलयुक्त झाले आहे.गावातील बंद पडलेल्या कूपनलिकांना व हातपंपांना नवसंजीवनी देण्यात आली.तसेच पावसाचे पाणी वायान घालवता शोषखड्ड्यांमार्फतत्याचा निचरा करून रेनवॉटर हार्वेस्टिंग तंत्राचा वापर केल्याने भूजलपातळी वाढली व परिणामत: अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कूपनलिकांना तुडुंब पाणी लागले.आतापर्यंत ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागतहोती. उन्हाळ्यात गावकरीस्थलांतर करून संपूर्ण गाव ओस पडायचा. मात्र आता ही परिस्थिती पालटली आहे.या गावाचा आदर्श घेऊन इतरांनाही असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़