शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

नापिकीला कंटाळलेल्या 25 वर्षाच्या शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 13:08 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबवण्याचं काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतोच आहे. नाशिकमध्येही अवघ्या 25 वर्षांच्या तरुण शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. शेततळ्याच्या पाण्यातच उडी घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. मालेगाव तालुक्यातील वाके गावातील ही घटना आहे.  
लातूरमध्ये शेतकरी कन्येची आत्महत्या
लातूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका शेतकरीच्या मुलीने आत्महत्या केली. दोन मुलींचे गेटकेन लग्न केल्यानंतर तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे असा प्रश्न तिच्या वडिलांपुढे होता. 21 वर्षांच्या शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या करुन शेतकरी वडिलांवरील लग्नाचा भार कमी केली.
(सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या)
 
विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या शीतलने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता. लातूर) येथे घडली. शीतलचे वडील व्यंकट वायाळ यांची साडेपाच एकर शेती असून कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे. त्यांचा मोठा मुलगा लातुरात तर लहान मुलगा गावातील शाळेत शिक्षण घेत आहे.
(शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या)
 
शेतीसाठी त्यांनी जिल्हा बँक, सहकारी संस्था व कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडून कर्ज काढले होते़ परंतु, शेतीतून काहीही उत्पन्न न निघाल्याने ते चिंताग्रस्त होते़ पैशाअभावी दोन वर्षांपासून शीतल हिचा थांबला होता. यातूनच तिने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून मी स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
 
रुढी-परंपरा कमी करण्यासाठी आत्महत्या
शेतातील सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक आहे़ माझ्या दोन बहिणींचे लग्न गेटकेन (अत्यंत साधेपणाने) करण्यात आले़ परंतु, माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून वडिलांचे दारिद्र्य संपत नव्हते. कुठलीही बँक, सावकाराकडून कर्ज न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून थांबले होते. वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी व समाजातील रुढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करीत आहे़ मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये, असे शीतलने म्हटले आहे.