शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

नापिकीला कंटाळलेल्या 25 वर्षाच्या शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: April 17, 2017 13:08 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबवण्याचं काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतोच आहे. नाशिकमध्येही अवघ्या 25 वर्षांच्या तरुण शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या 25 वर्षीय मनोज सावंत या तरुण शेतक-यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. शेततळ्याच्या पाण्यातच उडी घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली. मालेगाव तालुक्यातील वाके गावातील ही घटना आहे.  
लातूरमध्ये शेतकरी कन्येची आत्महत्या
लातूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका शेतकरीच्या मुलीने आत्महत्या केली. दोन मुलींचे गेटकेन लग्न केल्यानंतर तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे असा प्रश्न तिच्या वडिलांपुढे होता. 21 वर्षांच्या शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या करुन शेतकरी वडिलांवरील लग्नाचा भार कमी केली.
(सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या)
 
विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या शीतलने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता. लातूर) येथे घडली. शीतलचे वडील व्यंकट वायाळ यांची साडेपाच एकर शेती असून कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे. त्यांचा मोठा मुलगा लातुरात तर लहान मुलगा गावातील शाळेत शिक्षण घेत आहे.
(शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या)
 
शेतीसाठी त्यांनी जिल्हा बँक, सहकारी संस्था व कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडून कर्ज काढले होते़ परंतु, शेतीतून काहीही उत्पन्न न निघाल्याने ते चिंताग्रस्त होते़ पैशाअभावी दोन वर्षांपासून शीतल हिचा थांबला होता. यातूनच तिने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून मी स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
 
रुढी-परंपरा कमी करण्यासाठी आत्महत्या
शेतातील सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक आहे़ माझ्या दोन बहिणींचे लग्न गेटकेन (अत्यंत साधेपणाने) करण्यात आले़ परंतु, माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून वडिलांचे दारिद्र्य संपत नव्हते. कुठलीही बँक, सावकाराकडून कर्ज न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून थांबले होते. वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी व समाजातील रुढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करीत आहे़ मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये, असे शीतलने म्हटले आहे.