शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

२४७ उमेदवारांना पाच वर्षे निवडणूक बंदी

By admin | Updated: June 13, 2016 03:09 IST

ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न देणाऱ्या सुमारे २४७ उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.

आविष्कार देसाई,

अलिबाग- ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न देणाऱ्या सुमारे २४७ उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत निर्गमित करण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये एप्रिल, आॅगस्ट, आॅक्टोबर आणि डिसेंबर २०१५ या कालावधीत निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीतील खर्चाचा हिशेब निकाल घोषित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनाकडे देणे सर्व उमेदवारांना बंधनकारक होते. निकाल जाहीर झाल्यानंतर हिशेब देण्यास विलंब करणाऱ्या सुमारे ५०४ उमेदवारांची यादी प्रशासनाने तयार केली होती. त्यांना नोटीसही पाठविण्यात आली, परंतु प्रशासनाच्या नोटीसला सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यातील काही उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाला हिशेब विलंबाने दिल्याबाबतचे खुलासे दिले. त्यातील १६६ खुलासे प्रशासनाने मान्य केले आहेत. जिल्हा प्रशासनाला ज्यांनी फाट्यावर मारले त्या २४७ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. या प्रकरणातील ९१ अर्ज शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. वेळेवर खर्चाचा हिशेब न दिल्याने फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. यामध्ये कोणते उमेदवार आहेत त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. >बंदी घातलेल्या उमेदवारांना दिलासा२४७ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नसले, तरी त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत संधी प्राप्त होऊ शकते, अशी ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची बंदी घातलेल्या उमेदवारांसाठी या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. ज्यांना बंदी घालण्यात आली आहे ते कोकण आयुक्तांकडेही दाद मागू शकतात, तोही मार्ग त्यांच्यासाठी खुला आहे.निवडणुका पार पडल्यानंतरची ही नियमितची प्रक्रिया आहे. संबंधितांना आम्ही नोटीस पाठविल्या आहेत ही बाब खरी आहे. खुलासे अमान्य झालेल्यांना यापुढे निवडणूक लढविता येणार नाही.- पी.डी.मलिकनेर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड