शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

२४२ बांगलादेशी घुसखोरांना अटक

By admin | Updated: April 23, 2015 06:07 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी

डिप्पी वांकाणी, मुंबईगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जानेवारी २०१५ पर्यंत मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतात ठाण मांडणाऱ्या २४२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मागच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात येऊनही बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केलीच. २०१४ मध्ये एकट्या मुंबईत ४१८ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. यापैकी २८६ जणांना माघारी पाठविण्यात आले होते.सार्वत्रिक निवडणुकांमुळे सीमावर्ती भागात कडेकोट नाकाबंदी करण्यात आल्याने फारशी घुसखोरी झाली नाही; परंतु यावर्षी बांगलादेशींचे घुसखोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसते. मीरा रोड, ठाणे, मुंब्रा आदी भागांत ठाण मांडून हे बांगलादेशी मिळेल ते काम करतात, असे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.बांगलादेशी नागरिकांना भारतात मुक्तप्रवेश देण्यात सीमा सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. एक ते दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात बांगलादेशी नागरिकांना खुशाल भारतीय हद्दीत प्रवेश दिला जातो. भारताच्या विविध भागांत हे नागरिक काम करून भरपूर पैसा कमावतात. पुरेशी कमाई झाल्यानंतर ते या पैशातून गावी घर बांधण्यासाठीआपापल्या गावी परतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले.बांगलादेशी भारतीयांसारखेच दिसत असल्याने त्यांना हुडकणे कठीण आहे. एवढेच नाही तर यापैकी काही महाभाग अधिकाऱ्यांना लाच देऊन प. बंगालमधील मतदार ओळखपत्रही मिळवितात. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण असते. दहशतवादी संघटना कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. अलीकडेच मुंबईतील ९६ पोलीस ठाण्यांत दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बांगलादेशींंचा माग कसा काढायचा, याचे आठवडाभराचे प्रशिक्षण देण्यात येते. झोपडपट्टी भागात जाऊन तेथील लोकांकडून बांगलादेशींची माहिती घेण्याचेही कसब पोलिसांना शिकविले जाते.