शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

२४ तासांत जोरदार सरींचा अंदाज, पावसाचे पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:23 IST

जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला

मुंबई : जोरदार बरसत परतलेल्या पावसाने रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाच जणांचा बळी घेतला. मुंबईत मेट्रो चित्रपटगृहाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरला बॅरेज धरणाखालच्या ओढ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा; तर नवी मुंबईत खारघरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला.मुंबई शहरापेक्षा उपनगरात आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात दिवसभर मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत झाले. उपनगरी गाड्यांची वाहतूक, रस्ते वाहतूक मंदावली. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. चेंबूरमध्ये घराच्या छताचा काही भाग कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी पडलेल्या दमदार पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला.दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची एक लेन अद्याप बंद असून दोन लेनवरूनच वाहतूक सुरू आहे. संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, पनवेलजवळील कर्नाळा खिंडीतील वाहतूक मंदावली होती. महाडजवळ चौपदरीकरणाचे काम पावसामुळे बंद आहे. पण खोदकामामुळे मातीचा भराव रस्त्यावर येत असल्याने दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेसाठी काही धोकादायक वळणावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.बदलापूरच्या बॅरेज धरणाच्या ओढ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्याचे नाव गोपाळ दास (वय २०) असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली.खारघरमध्ये तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात फैयान खान (वय १९), रियान खान (वय १९) आणि अबिद सिद्दिकी (वय ३६) यांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही तळोजा वसाहतीत राहणारे आहेत. पावसाने तलावात पाणी साचल्याने ते पोहण्यास उतरले, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. पांडवकडा धबधब्यावर प्रवेशबंदी असल्याने अनेकजण आसपासच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात उतरत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. बुडालेल्या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून अग्नीशमन दलाचे जवान उरलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.मुंबई शहर, उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी वरुणराजाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर, संध्याकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच होता.पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरीवली, गोरेगांव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात मात्र पावसाचा जोर दिवसभर काहीसा कमी होता. पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत होते. चेंबूरच्या विश्व गौतमनगर वसाहतीतील एका घराच्या छताचा भाग कोसळल्याने शिवाजी कळके हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.कुलाब्यात रविवारी संध्याकाळपर्यंत १२.०४ मिमी, तर सांताक्रुझमध्ये ८४.०३ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने आणि सुट्टीचा दिवस असल्याने, पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला जास्त प्रमाणात बसला नाही. पण वाहतूक विस्कळीतच होती. रस्त्यावरील वाहतूकही संथ गतीने सरकत होती. पुढचे २४ तास पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सोमवारी याचा फटका रेल्वे, वाहतुकीला बसण्याची भीती आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत शॉर्टसर्किट आणि झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या. शहरात ५, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा नऊ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली, तसेच शहरात एकूण १७ ठिकाणी झाडे किंवा झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, यातही कोणाला दुखापत झाली नाही. 

टॅग्स :Mumbai Rainमुंबईचा पाऊस