शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

वीज कनेक्शनसाठी तब्बल २२ वर्षे फरफट

By admin | Updated: June 13, 2015 00:50 IST

मंडळाकडे शंभरावर हेलपाटे : जावळी तालुक्यातील करंदेच्या शेतकऱ्याची व्यथा

विश्वास पाटील - कोल्हापूर -‘मागेल त्याला वीज कनेक्शन’, अशी महावितरणची घोषणा असली, तरी ती किती खोटी आहे, याचा दाखला देणारा अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकऱ्यास येत आहे. विहिरीवरील वीज कनेक्शन मिळावे, यासाठी गेली २२ वर्षे ते वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यासाठीचे शुल्कही त्यांनी भरले आहे; परंतु आजअखेर त्यांना हे कनेक्शन मिळालेले नाही.‘सरकारी यंत्रणा गोरगरीब शेतकऱ्यांना कशी त्रास देते’, अशा आशयाचा प्रस्तुत बातमीदारांनी लिहिलेला लेख वाचून निकम यांनी आपल्यालाही वीज कनेक्शनसाठी कसा त्रास झाला, याची कैफियत मांडली. करंदी हे छोटेसे तीन हजार लोकवस्तीचे गाव. तिथे निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ ला वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी १९१० रुपये मेढा येथे जाऊन अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. अर्ज केला तेव्हा त्यांचे वय ५३ होते. आता ते ७४ वर्षांचे झाले आहेत. अजून किती वर्षे मी मंडळाचे उंबरे झिजवू हे तरी सांगा, अशी विचारणा त्यांनी अर्जात केली आहे.मेढा कार्यालयात चौकशी केल्यावर त्यांना २०१० ला सांगण्यात आले की, तुमच्या पहिल्या अर्जाची मुदत संपली आहे. त्याची अनामत रक्कम परत मिळेल; परंतु कनेक्शनसाठी नवीन अर्ज करा. त्यानुसार निकम यांनी १२ आॅक्टोबर २०११ ला ३०२५ रुपये (अर्ज क्रमांक - १०९३०१५, पावती क्रमांक - १२१६५००, ग्राहक नंबर- १९५३४००००७४४, मेढा उपविभाग - १२) परत भरले; परंतु तरीही त्यांना आजअखेर कनेक्शन मिळालेले नाहीच. शिवाय पहिल्या अर्जाची अनामत रक्कमही मिळालेली नाही. एक वीज बिल थकीत राहिले म्हटल्यावर ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची भीती दाखविणारे ‘महावितरण’ या शेतकऱ्याचे कष्टाचे १९१० रुपये देताना या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे त्यांना हेलपाटे मारायला लावत आहे. ही रक्कम व्याजासह मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. निकम यांच्या विहिरीपासून विजेचा खांब साठ फुटांवर आहे. त्यावर त्यांची तीन एकर शेती पाण्याखाली येऊ शकते. त्यांनी या कनेक्शनसाठी आतापर्यंत शंभरांहून जास्त वेळा येरझारा मारल्या आहेत.यासंदर्भात मेढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कनेक्शन देण्यास विलंब झाला असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘कंत्राटदाराच्या चुकीमुळे फिडर सेपरेशनचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने कनेक्शन देण्यास उशीर झाला. त्यांनी पहिला अर्ज १९९३ ला केला, तेव्हा बहुधा टेस्ट रिपोर्ट दिला नसावा. त्यामुळे त्यांच्या पहिल्या प्रस्तावाचे शुल्क तातडीने परत देऊन नव्याने केलेल्या अर्जानुसार कनेक्शन लवकरात लवकर कसे देता येईल, असे प्रयत्न करतो.’एक हजार लाचनिकम यांना कनेक्शन लवकर मिळवून देतो, असे सांगून स्थानिक वायरमनने त्यांच्याकडून ६ डिसेंबर २०१३ ला एक हजार रुपयांची लाच घेतली. गावातच त्यांनी त्याला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या; परंतु कामही झालेले नाही व पैसेही गेले, असा अनुभव त्यांना आला.