शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

वीज कनेक्शनसाठी तब्बल २२ वर्षे फरफट

By admin | Updated: June 13, 2015 00:50 IST

मंडळाकडे शंभरावर हेलपाटे : जावळी तालुक्यातील करंदेच्या शेतकऱ्याची व्यथा

विश्वास पाटील - कोल्हापूर -‘मागेल त्याला वीज कनेक्शन’, अशी महावितरणची घोषणा असली, तरी ती किती खोटी आहे, याचा दाखला देणारा अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकऱ्यास येत आहे. विहिरीवरील वीज कनेक्शन मिळावे, यासाठी गेली २२ वर्षे ते वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यासाठीचे शुल्कही त्यांनी भरले आहे; परंतु आजअखेर त्यांना हे कनेक्शन मिळालेले नाही.‘सरकारी यंत्रणा गोरगरीब शेतकऱ्यांना कशी त्रास देते’, अशा आशयाचा प्रस्तुत बातमीदारांनी लिहिलेला लेख वाचून निकम यांनी आपल्यालाही वीज कनेक्शनसाठी कसा त्रास झाला, याची कैफियत मांडली. करंदी हे छोटेसे तीन हजार लोकवस्तीचे गाव. तिथे निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ ला वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी १९१० रुपये मेढा येथे जाऊन अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. अर्ज केला तेव्हा त्यांचे वय ५३ होते. आता ते ७४ वर्षांचे झाले आहेत. अजून किती वर्षे मी मंडळाचे उंबरे झिजवू हे तरी सांगा, अशी विचारणा त्यांनी अर्जात केली आहे.मेढा कार्यालयात चौकशी केल्यावर त्यांना २०१० ला सांगण्यात आले की, तुमच्या पहिल्या अर्जाची मुदत संपली आहे. त्याची अनामत रक्कम परत मिळेल; परंतु कनेक्शनसाठी नवीन अर्ज करा. त्यानुसार निकम यांनी १२ आॅक्टोबर २०११ ला ३०२५ रुपये (अर्ज क्रमांक - १०९३०१५, पावती क्रमांक - १२१६५००, ग्राहक नंबर- १९५३४००००७४४, मेढा उपविभाग - १२) परत भरले; परंतु तरीही त्यांना आजअखेर कनेक्शन मिळालेले नाहीच. शिवाय पहिल्या अर्जाची अनामत रक्कमही मिळालेली नाही. एक वीज बिल थकीत राहिले म्हटल्यावर ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची भीती दाखविणारे ‘महावितरण’ या शेतकऱ्याचे कष्टाचे १९१० रुपये देताना या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे त्यांना हेलपाटे मारायला लावत आहे. ही रक्कम व्याजासह मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. निकम यांच्या विहिरीपासून विजेचा खांब साठ फुटांवर आहे. त्यावर त्यांची तीन एकर शेती पाण्याखाली येऊ शकते. त्यांनी या कनेक्शनसाठी आतापर्यंत शंभरांहून जास्त वेळा येरझारा मारल्या आहेत.यासंदर्भात मेढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कनेक्शन देण्यास विलंब झाला असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘कंत्राटदाराच्या चुकीमुळे फिडर सेपरेशनचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने कनेक्शन देण्यास उशीर झाला. त्यांनी पहिला अर्ज १९९३ ला केला, तेव्हा बहुधा टेस्ट रिपोर्ट दिला नसावा. त्यामुळे त्यांच्या पहिल्या प्रस्तावाचे शुल्क तातडीने परत देऊन नव्याने केलेल्या अर्जानुसार कनेक्शन लवकरात लवकर कसे देता येईल, असे प्रयत्न करतो.’एक हजार लाचनिकम यांना कनेक्शन लवकर मिळवून देतो, असे सांगून स्थानिक वायरमनने त्यांच्याकडून ६ डिसेंबर २०१३ ला एक हजार रुपयांची लाच घेतली. गावातच त्यांनी त्याला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या; परंतु कामही झालेले नाही व पैसेही गेले, असा अनुभव त्यांना आला.