शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करणार

By admin | Updated: June 19, 2017 02:36 IST

राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. २०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे परिषदेचे ध्येय आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.रावते यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती; या वेळी दिवाकर रावते बोलत होते. बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, अपर पोलीस महासंचालक आर.के. पद्मनाभन, प्रभारी परिवहन आयुक्त रणजितसिंह देओल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते. परिषदेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन दल, उत्पादन शुल्क आदी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.राज्यात ५७ कोटी रुपये रस्ते सुरक्षा निधी जमा झाला आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांसाठी हा निधी वापरावा, असा आदेश मंत्र्यांनी परिवहन आयुक्तांना दिला आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांसाठी वाहनचालकांची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.