शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

२०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करणार

By admin | Updated: June 19, 2017 02:36 IST

राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. २०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे परिषदेचे ध्येय आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.रावते यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती; या वेळी दिवाकर रावते बोलत होते. बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, अपर पोलीस महासंचालक आर.के. पद्मनाभन, प्रभारी परिवहन आयुक्त रणजितसिंह देओल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते. परिषदेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन दल, उत्पादन शुल्क आदी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.राज्यात ५७ कोटी रुपये रस्ते सुरक्षा निधी जमा झाला आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांसाठी हा निधी वापरावा, असा आदेश मंत्र्यांनी परिवहन आयुक्तांना दिला आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांसाठी वाहनचालकांची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.