शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

२० वर्षांपासून विद्यार्थिनींची निवास व्यवस्था वर्गखोलीतच !

By admin | Updated: November 14, 2016 20:33 IST

खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेतच नव्हे तर सामाजिक न्याय विभागाच्या निवासी आश्रम शाळेतही विद्यार्थिनींच्या

ऑनलाइन लोकमत/ गणेश मापारी  
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.14 -  खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेतच नव्हे तर सामाजिक न्याय विभागाच्या निवासी आश्रम शाळेतही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. तब्बल २० वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थिनींची निवास व्यवस्था वर्गखोलीतच करण्यात आली असून या शाळेवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने शाळेला अनुदानाची खिरापत वाटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या निवासासाठी योग्य व्यवस्था नव्हती त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना रात्री वर्गखोलीतच झोपण्याबाबत दबाव टाकण्यात येत होता. ही बाबही पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी निवासाकरिता स्वतंत्र व्यवस्था असणे बंधनकारक आहे. असे असतानाही पाळा येथील दोन्ही विभागाच्या आश्रम शाळेने निवास व्यवस्थेबाबत गंभीरतेने घेतले नाही. वेगवेगळ्या संस्थानच्या नावे शाळा उघडून कोकरेंच्या व्यवस्थापनाने गेल्या २० वर्षांपासून करोडो रुपयांचे अनुदान लाटले आहे. आदिवासी शाळेच्या अत्याचार प्रकरणानंतर या शाळेमधील सोयी-सुविधांची दखल आता घेतली जात आहे. 
मात्र याच व्यवस्थापनाच्या दुसºया शाळेचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या निवासी प्राथमिक आश्रम शाळेला १८ सप्टेंबर १९९६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. 
या शाळेमध्ये १९९६ पासून विद्यार्थिनी निवासी राहतात. असे असतानाही अद्याप पर्यंत विद्यार्थिनींच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित अधिकाºयांनीही डोळेझाक केली आहे. या प्रकाराला जबाबदार व्यवस्थापन व प्रशासनातील अधिकाºयांवर सुध्दा कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे. 
 
२० वर्षानंतर का आली जाग?
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाने गत तीन महिन्यापूर्वीच आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनींना निवासी ठेवण्याबाबत मनाई केली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाला २० वर्षानंतर विद्यार्थिनींची काळजी का करावी वाटली? असा प्रश्न आता या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला आहे. आदिवासी विभागाच्या शाळेत विद्यार्थिनींवर होत असलेल्या अत्याचाराची कुणकुण लागल्यामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींना निवासी ठेवण्याबाबत मनाई करण्यात आली अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
 
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणे आवश्यक
जिल्हाधिकाºयांकडून नेमण्यात आलेल्या विशेष पथकाद्वारे आश्रम शाळांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान आश्रम शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत संवाद साधणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यास  शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाºया सुविधांबाबत मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.