शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदानास मंजुरी

By admin | Updated: June 15, 2016 06:07 IST

राज्यातील विनाअनुदानित शाळांना १ जूनपासून २० टक्के अनुदान देण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मंज़ुरी देण्यात आली. या निर्णयाचा लाभ १ हजार ६२८ प्राथमिक

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना १ जूनपासून २० टक्के अनुदान देण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मंज़ुरी देण्यात आली. या निर्णयाचा लाभ १ हजार ६२८ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि २ हजार ४५२ तुकड्यांमधील १९ हजार २४७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. शिक्षक संघटना आणि शिक्षक व पदवीधर आमदारांनी काही महिन्यांपासून या संदर्भात सुरू केलेल्या आंदोलनाला त्यामुळे यश मिळाले आहे. २० टक्के अनुदानाचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे यंदाच्या वर्षी शासनाच्या तिजोरीवर १९४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मागील आघाडी सरकारने कायम विनाअनुदानित शाळांपुढील ‘कायम’ शब्द वगळून या शाळांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या शाळांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विविध शिक्षक संघटना, शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. ऐन परीक्षेच्या काळात त्यांनी बहिष्काराचे शस्त्र उगारल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र शाळा सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक असतानाही अनुदानाचा निर्णय न झाल्याने चिडलेल्या शिक्षकांनी दोन आठवड्यापूर्वी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान जालन्यातील शिक्षक गजानन खरात यांच्या निधनामुळे हे आंदोलन चिघळले होते. या पार्श्वभूीमवर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, श्रीकांत देशपांडे, रामनाथ मोते, विक्रम काळे, ना.गो. गाणार, दत्तात्रय सावंत, कपील पाटील, प्रा.अनिल सोले, भगवान साळुंखे आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

अजेंड्यावर विषय नव्हता!

अनुदानाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात दिले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय अपेक्षित असताना बैठकीच्या अजेंड्यावर विषयच नसल्याची कुणकुण लागल्यानंतर शिक्षक, पदवीधर आमदार पुन्हा सक्रिय झाले. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेण्याची गळ घातली. त्यानंतर कुठे २० टक्के अनुदान देण्यास आज तत्वत: मान्यता देण्यात आली.

शंभर टक्के द्या!

दरम्यान, २० टक्के अनुदान देण्याच्या निर्णयावर शिक्षक आमदारांनी आनंद व्यक्त केला असला, तरी त्यावर समाधानी नसल्याचे सांगत शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)