शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

साकव तुटल्याने १९ जखमी, ५ गंभीर

By admin | Updated: March 14, 2017 07:32 IST

ग्रामदेवतेच्या होळीसाठी पौर्णिमेला ग्रामस्थ माड नेत असताना लोखंडी साकव तुटल्याने १९जण पडून जखमी झाले आहेत

आरवली : ग्रामदेवतेच्या होळीसाठी पौर्णिमेला ग्रामस्थ माड नेत असताना लोखंडी साकव तुटल्याने १९जण पडून जखमी झाले आहेत. त्यापैकी पाचजण गंभीर जखमी असून, त्यांना डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी खाचरवाडी-म्हापर्लेवाडी दरम्यान तुटल्याने घडली. सर्वत्र उत्साहात शिमगा सण साजरा होत असताना या घटनेनंतर एकच हाहाकार उडाला.कळंबुशी येथील खाचरवाडी ते बौद्धवाडी, म्हापर्लेवाडी या वाड्यांना जोडणारा लोखंडी साकव सन १९८० मध्ये जिल्हा परिषदेकडून बांधण्यात आला आहे. याच साकवावरून सुमारे ८० जण पौर्णिमेच्या होळीसाठी माड घेऊन निघाले होते. साकव २२ फूट लांबीचा आणि सहा फूट रुंदीचा आहे. हे सर्वजण साकवावर आले असता भार सहन न झाल्याने साकवाचा लोखंडी अँगल तुटला आणि साकव मधोमध तुटला. यामुळे सर्वजण साकवावरून सुमारे २० फूट खाली पऱ्यात एकमेकांवर कोसळले. काळोख होत चालल्यामुळे आणि होळीची वेळ जवळ येत असल्याने एकच तारांबळ उडाली.मंगेश सोमा फेफडे, संदीप राजाराम ठीक, अमोल अशोक चव्हाण, भालचंद्र प्रभाकर चव्हाण, रुपेश हरिश्चंद्र पाचकुडे, रुपेश सुहास डावूल, अक्षय अरुण चव्हाण, अजय रामचंद्र चव्हाण, शरद बाळकृष्ण चव्हाण, विनेश बाळकृष्ण चव्हाण, चंद्रकांत ठीक, प्रशांत तुकाराम काजवे, अमोल अनंत काजवे आणि साहील विजय आंबवकर हेही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आरवली, माखजन आणि सावर्डे आदी ठिकाणी उपचार करण्यात आले. माखजन आणि आरवली परिसरात सगळीकडे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात शिमगा सण साजरा होत असताना कळंबुशी येथील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदतकार्य सुरू केले. (वार्ताहर)