शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

तासाला 19 बळी!

By admin | Updated: June 8, 2014 01:57 IST

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे.

सुशांत मोरे 
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून दरवर्षी साधारण 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होत आहे. ही संख्या 2008 सालापासून तर वाढत जाणारी आहे. अपघात झाल्यास तत्काळ न मिळणारी वैद्यकीय सुविधा यामुळेच अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. 2008 साली 1 लाख 118 हजार 239 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला होता. तर 2012मध्ये हीच संख्या पाहिली असता 1 लाख 39 हजार 91 एवढी झाली आहे. यामध्ये तामिळनाडूसारखे राज्य आघाडीवर असून, 2012 मध्ये 16 हजार 175 प्राणांतिक अपघात झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागत असून, 15 हजार 109 प्राणांतिक अपघात झाल्याचे ब्युरोच्या माहितीतून समोर आले आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून, झालेल्या 60 हजार अपघातांपैकी 13 हजार 333 आणि 2013मध्ये 12 हजार 187 प्राणांतिक अपघात आहेत. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला असता राज्यात 15 राष्ट्रीय महामार्ग असून, 291 राज्य महामार्ग आहेत. हे सर्व रस्ते 33 हजार 165 किलोमीटर्पयत पसरलेले आहेत. राज्यातील एकूण महामार्गापैकी पाच महामार्ग हे सर्वात धोक्याचे समजले जातात. यात मुंबई-पुणो, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-आग्रा, मुंबई-अहमदाबाद आणि पुणो-सोलापूर-हैदराबादचा समावेश आहे. या महामार्गावरून प्रवास करणो म्हणजे एक प्रकारे अपघातालाच निमंत्रण देण्यासारखे आहे. या पाचही महामार्गावर सव्वा वर्षात साडेपाच हजार अपघात झाले असून, तब्बल 1 हजार 761 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुख्य बाब म्हणजे मुंबई-आग्रा आणि मुंबई-कोल्हापूर महामार्ग सर्वाधिक आघाडीवर आहेत. हे अपघात पाहता अजूनही हे अपघात कमी करण्यासाठी ठोस असे पाऊल उचलण्यात आले नसल्याचेच दिसून येते. 
रेल्वेपेक्षा रस्ते अपघात अधिक 
रेल्वे अपघातात मृत्यू होणा:यांचे प्रमाण अधिक असल्याची ओरड नेहमीच केली जाते. अपघात जास्त होत असल्याने आणि प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेकांचा बळी जात असल्याचे सांगितले जाते. रेल्वेचा आवाका आणि प्रवासी संख्या पाहिली असता रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना तशी मदत दिली जाते. मात्र तुलनेने पाहता रस्ते अपघातात मृत्यू पावणा:यांची संख्या आणि त्यांना मिळणा:या वैद्यकीय सुविधा यात फारच तफावत असल्याचे दिसते. 
दरवर्षी देशभरातील रेल्वे अपघातांत साधारण 15 हजार ते 18 हजार जणांचे बळी जात आहेत. हे अपघात रोखण्यास रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यासाठी रेल्वेकडून साधारणपणो 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वापरला जातो. तसेच रेल्वेच्या अर्थसंकल्पातही अपघात रोखण्यासाठी मोठी तरतूद केली जाते. दुर्दैवाने रस्ते अपघाताबाबत तसे काही होताना दिसत नाही. 
 
राज्यातील रस्ते अपघातात प्रत्येक वर्षी 2 ते 3 हजार तरुणांचे बळी जात आहेत.दारू पिऊन वाहन चालवणो, ओव्हरटेक करणो, अधिक वेगाने वाहन चालवण्यामुळे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत.