शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १९ टक्क्यांनी कोरोना रुग्ण घटले, मुंबईत वाढ; मृत्युदर १.१६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 07:51 IST

मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली. 

मुंबई : राज्यासह मुंबईच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता दोन्हीकडे वेगवेगळे चित्र दिसून येते. मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली. राज्यातील रुग्णसंख्या व मृत्युदरात घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये राज्याचा मृत्युदर १.६५ टक्के होता. तो आता कमी होऊन १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान १.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ राज्यात फक्त रुग्णसंख्याच कमी झालेली नाही, तर मृत्युदरातही घट झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून, काही जिल्हे सोडल्यास काळजीचे वातावरण नसल्याचे राज्य कोविड टास्क फोर्सने स्पष्ट केले. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृत्युदरामध्ये घट नोंदविण्यात आली आहे. फेब्रुवारीआधी दररोज ४,६९० रुग्ण सापडत होते. तेव्हा १,४६४ मृत्यू नोंदविण्यात आले. मात्र, आता सरासरी रुग्ण घटले असून, मृत्यूही तीनअंकी नोंदविले जात आहेत.राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सणाचे दिवस सोडले, तर कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याखेरीज अन्य जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णांचा आलेख घसरता आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचाराधीन रुग्ण १०० च्या खाली आहेत. नंदुरबार आणि भंडाऱ्यात केवळ दोन रुग्ण आहेत. राज्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा २.०३ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर असून, याचे प्रमाण ६.९ टक्के आहे. त्याखालोखाल, पुणे, नाशिक आणि पालघरचे स्थान आहे. डॉ. जोशी यांनी सांगितले की, पुढील तीन महिन्यांसाठी मुंबईतील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष राहील, असे ते म्हणाले.राज्यात दैनंदिन रुग्णांत मोठी घट राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली, त्यानंतर संसर्गाच्या दोन लाटांचा तडाखा सहन केल्यानंतर आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत आहे. परिणामी, तीव्र संसर्गानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या १,५५३, तर मृत्यू २६ असल्याची नोंद झाली. सध्या २९,६२७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात दिवसभरात १,६८२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६४,१६,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या ८,०८९ आहे. त्याखालोखाल मुंबई ६०५६, ठाणे ३९४३, अहमदनगर ३७६९, रायगड १११३, सातारामध्ये ११३५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात ९ कोटी जणांना कोरोना लसराज्यात शुक्रवारी ४१,०५८ जणांना कोरोना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण ९,०७,८७,५१५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ३,३६,३८,२६ जणांना पहिला डोस, तर ९७,०८,५९५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या