शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यात १९ टक्क्यांनी कोरोना रुग्ण घटले, मुंबईत वाढ; मृत्युदर १.१६ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 07:51 IST

मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली. 

मुंबई : राज्यासह मुंबईच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता दोन्हीकडे वेगवेगळे चित्र दिसून येते. मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली. राज्यातील रुग्णसंख्या व मृत्युदरात घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये राज्याचा मृत्युदर १.६५ टक्के होता. तो आता कमी होऊन १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान १.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ राज्यात फक्त रुग्णसंख्याच कमी झालेली नाही, तर मृत्युदरातही घट झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून, काही जिल्हे सोडल्यास काळजीचे वातावरण नसल्याचे राज्य कोविड टास्क फोर्सने स्पष्ट केले. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृत्युदरामध्ये घट नोंदविण्यात आली आहे. फेब्रुवारीआधी दररोज ४,६९० रुग्ण सापडत होते. तेव्हा १,४६४ मृत्यू नोंदविण्यात आले. मात्र, आता सरासरी रुग्ण घटले असून, मृत्यूही तीनअंकी नोंदविले जात आहेत.राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सणाचे दिवस सोडले, तर कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याखेरीज अन्य जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णांचा आलेख घसरता आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचाराधीन रुग्ण १०० च्या खाली आहेत. नंदुरबार आणि भंडाऱ्यात केवळ दोन रुग्ण आहेत. राज्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा २.०३ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर असून, याचे प्रमाण ६.९ टक्के आहे. त्याखालोखाल, पुणे, नाशिक आणि पालघरचे स्थान आहे. डॉ. जोशी यांनी सांगितले की, पुढील तीन महिन्यांसाठी मुंबईतील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष राहील, असे ते म्हणाले.राज्यात दैनंदिन रुग्णांत मोठी घट राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली, त्यानंतर संसर्गाच्या दोन लाटांचा तडाखा सहन केल्यानंतर आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत आहे. परिणामी, तीव्र संसर्गानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या १,५५३, तर मृत्यू २६ असल्याची नोंद झाली. सध्या २९,६२७ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात दिवसभरात १,६८२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६४,१६,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या ८,०८९ आहे. त्याखालोखाल मुंबई ६०५६, ठाणे ३९४३, अहमदनगर ३७६९, रायगड १११३, सातारामध्ये ११३५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात ९ कोटी जणांना कोरोना लसराज्यात शुक्रवारी ४१,०५८ जणांना कोरोना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण ९,०७,८७,५१५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ३,३६,३८,२६ जणांना पहिला डोस, तर ९७,०८,५९५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या