शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

१८ लाख खटले प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 1, 2015 02:37 IST

वेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील

विजय मोरे, नाशिकवेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता ते केव्हा निकाली निघणार याबाबत साशंकताच आहे़ राज्यातील १,२९१ न्यायालयांमध्ये १८ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख ३५ हजार ६१३ खटले प्रलंबित आहेत़ न्यायाधीशांची कमी संख्या, अपुरे न्यायालयीन कर्मचारी, पायाभूत सुविधांचा अभाव, साक्षीदारांची गैरहजेरी, पोलीस यंत्रणेचा असमन्वय हे खटले प्रलंबित राहण्यासाठीचे प्रमुख घटक आहेत़ पण त्याबरोबरच न्यायालयीन सुट्या हादेखील महत्त्वाचा भाग आहे़ न्यायालयीन प्रक्रिया आजही ब्रिटिशांनी घालून कार्यपद्धतीनुसारच सुरू आहे़ दुसरा व चौथ्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्या, नाताळ, उन्हाळी एक महिना सुटीच्या कालावधीत न्यायालयांचे कामकाजच होत नाही़कोणत्याही खटल्याची सुनावणी तीनपेक्षा अधिक वेळा तहकूब करू नये, अशी तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेत आहे. मात्र, वास्तव वेगळेच आहे. पोलीस न्यायालयात मुदतीत (नव्वद दिवसांत) दोषारोपपत्र दाखल करतात. मात्र, त्यात अनेक त्रुटी असतात. सक्षमपणे पुरावे गोळा न करणे, तपास अधिकाऱ्याने घाईगडबडीत दोषारोपपत्र दाखल केल्याने त्यात चुका होणे याचा परिणाम गुन्हा सिद्धतेवर होतो़न्यायालयातील खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अव्यवहारी असल्याचे सांगून फेटाळली जाते. मात्र, आता खालच्या कोर्टात पाच आणि वरच्या कोर्टात दोन वर्षांत खटला निकाली काढला पाहिजे, असे बंधन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी नुकतेच घालून दिले आहे.प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडतात़ न्यायालयात दाखल होणारे व निकाली निघणारे खटले यात मोठी तफावत दिसून येते़