शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख खटले प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 1, 2015 02:37 IST

वेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील

विजय मोरे, नाशिकवेळेत आणि योग्य न्याय मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे़ उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारे पक्षकारावर अन्यायच़ मात्र न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता ते केव्हा निकाली निघणार याबाबत साशंकताच आहे़ राज्यातील १,२९१ न्यायालयांमध्ये १८ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख ३५ हजार ६१३ खटले प्रलंबित आहेत़ न्यायाधीशांची कमी संख्या, अपुरे न्यायालयीन कर्मचारी, पायाभूत सुविधांचा अभाव, साक्षीदारांची गैरहजेरी, पोलीस यंत्रणेचा असमन्वय हे खटले प्रलंबित राहण्यासाठीचे प्रमुख घटक आहेत़ पण त्याबरोबरच न्यायालयीन सुट्या हादेखील महत्त्वाचा भाग आहे़ न्यायालयीन प्रक्रिया आजही ब्रिटिशांनी घालून कार्यपद्धतीनुसारच सुरू आहे़ दुसरा व चौथ्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्या, नाताळ, उन्हाळी एक महिना सुटीच्या कालावधीत न्यायालयांचे कामकाजच होत नाही़कोणत्याही खटल्याची सुनावणी तीनपेक्षा अधिक वेळा तहकूब करू नये, अशी तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेत आहे. मात्र, वास्तव वेगळेच आहे. पोलीस न्यायालयात मुदतीत (नव्वद दिवसांत) दोषारोपपत्र दाखल करतात. मात्र, त्यात अनेक त्रुटी असतात. सक्षमपणे पुरावे गोळा न करणे, तपास अधिकाऱ्याने घाईगडबडीत दोषारोपपत्र दाखल केल्याने त्यात चुका होणे याचा परिणाम गुन्हा सिद्धतेवर होतो़न्यायालयातील खटले निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी अव्यवहारी असल्याचे सांगून फेटाळली जाते. मात्र, आता खालच्या कोर्टात पाच आणि वरच्या कोर्टात दोन वर्षांत खटला निकाली काढला पाहिजे, असे बंधन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी नुकतेच घालून दिले आहे.प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडतात़ न्यायालयात दाखल होणारे व निकाली निघणारे खटले यात मोठी तफावत दिसून येते़