शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१७ हजार शेतकऱ्यांना मिळणार सूक्ष्म सिंचनाचा लाभ; कृषी विभागाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 08:40 IST

गतवर्षी आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची निवड, पिकांसाठी पाण्याचा कार्यक्षमपद्धतीने वापर व्हावा कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन संच घेण्यासाठी अनुदान दिले जाते.

नाशिक :  प्रधानमंत्री कृषी योजनेंतर्गत या वर्षभरात १७ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, त्या माध्यमातून १३,५२४ हेक्टर इतके क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे. गतवर्षात कृषी विभागाच्या वतीने अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार ५३९ शेतकऱ्यांच्या ५१२३.४० हेक्टर क्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यात आले आहेत. हे मागील वर्षीच्या खरीप हंगामाचे वैशिष्ट्य ठरल्याचा दावा केला जात आहे. 

पिकांसाठी पाण्याचा कार्यक्षमपद्धतीने वापर व्हावा कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन संच घेण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभ घेऊ इच्छित असले तरी यासाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानाप्रमाणे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जात असते. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. गतवर्षात  साडेआठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.