जालना : विधानसभेतही युतीचेच वर्चस्व राहणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांमधील जवळपास १७ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छूक असून, त्यात उस्मानाबादचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाजनादेश यात्रा बुधवारी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहे. भोकरदन, जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौºयावर येत असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना युतीच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र, सध्या आपण त्यावर भाष्य करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.
आणखी १७ आमदार भाजपच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:25 IST